एक्स्प्लोर

वादळ आलं तरी, 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्र्यांची माहिती, सिंधुदुर्गात नवा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्याच तेजाने आणि स्वाभिमाने हा पुतळा उभा झालाय

सिंधुदुर्ग : मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji maharaj statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्याच तेजाने आणि स्वाभिमाने हा पुतळा उभा झालाय. मालवण किल्ल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा हा पुतळा प्रस्थापित करू शकलो. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांचा काळात काम वेगाने झालं. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली. 

आयआयटीचे अभियंते आणि जे.जे महाविद्यालयीतल शिल्पकार हे पुतळा घडवताना सोबत होते. त्यामुळेच, जरी वादळं आली, तरी त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास 93 फुट ऊंच हा पुतळा असून 10 फुटाचा चबुतरा देखील आहे. विशेष म्हणजे देशातला सर्वात उंच पुतळा देखील हा आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात पुतळा टिकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  पुतळ्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी पुढील 10 वर्षांसाठी कंत्राटदार यांच्याकडेच असेल. आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्थितीत महाराजांना साजेसा पुतळा उभारू तो पूर्ण झालाय, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. 

वादळातही पुतळा टीकेल - शिल्पकार सुतार

पुतळा कोसळल्यानंतर नेमका तो का पडला असेल याची कारणं शोधली आणि त्यानंतर ह्या पुतळ्याची उभारणी केल्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले. या आधीच्या पुतळ्यात फक्त लोखांडाचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे त्याला 3-4 महिन्यांत जंग लागला. त्यामुळे, ह्या पुतळ्याची उभारणी करताना आम्ही ब्रॉन्झ, झिंकसारख्या धातूंचा वापर केला. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती करताना देखील वापरत आहोत. अशात, दीर्घकाळ हा टीकावा असं नियोजन केलं. तसेच, दुसरीकडे चक्रीवादळात देखील पुतळा टिकेल याचे नियोजन केल्याचे अनिल सुतार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याची उंची 60 फुट आहे, एकूण पुतळ्याची उंची तलवारीपर्यंत 93 फूट आहे. सोबतच, चबुतरा 10 फुटाचा आहे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा

भारताशी पंगा घेतल्यानं पाकिस्तान कंगाल, अवघ्या तीन दिवसातच हाती भिकेचा कटोरा, किती किंमत मोजावी लागली?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget