एक्स्प्लोर

भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार असून विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवा चेहरा मैदानात असणार आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांत भाजपला घवघवतीस यश मिळालं असून महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे, भाजपच्या या यशाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांना दिलं जातं. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. आगामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून (BJP) भाकरी फिरवली जाणार असून प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा व पदभार देण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त ठरला आहे. 

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार असून विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवा चेहरा मैदानात असणार आहे. भाजपकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी नव्या चेहऱ्याकडे देण्यात येत असून भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार असल्याचे समजते. 

बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात येईल. नुकतेच भाजपने संघटन पर्व अभियान सुरू केले असून या संघटन पर्व अभियानाची जबाबदारी व राज्याचे प्रभारी म्हणून माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. आमदार चव्हाण यांनीही पदभार स्वीकारताच अभियानाच्या कामाला सुरुवात केली असून जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त असणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी विशेष निवडप्रक्रिया राबवली जाणार आहे. 

काय आहे संघटनपर्व

भाजपचा विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची मूळ संघटना आणि इतर मोर्चा आणि पक्षातील सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या संघटन पर्व या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना भाजपसोबत जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले आहे

कशी असेल भाजपची निवड प्रक्रिया?

1 ते 20 जानेवारीपर्यंत भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवणार 

20 ते 28 जानेवारी दरम्यान तब्बल 5 लाख अॅक्टीव्ह सदस्य तयार करण्यात येतील. 

1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 1 लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आहे.

भाजपकडून 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात 708 तालुका प्रमुखांची निवड केली जाणार आहे. 

भाजपच्यावतीने 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 78 जिल्हा प्रमुखही निवडले जाणार आहेत. 

अखेर 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. 

हेही वाचा

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget