एक्स्प्लोर

Ashish Shelar: आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील 'भोपळा' फ्रेम करुन पाठवणार

BJP Ashish Shelar in Mumbai: अमितची मतं महेश सावंतांनी, संदीप देशपांडेंची मतं आदित्य ठाकरेंनी चोरली का, आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं

Ashish Shelar on Thackeray Brothers: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनलचा पराभव झाल्यानंतर मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मी ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाची (BEST Election Result 2025) फ्रेम करुन पाठवणार आहे. त्या फ्रेममध्ये फक्त भोपळा असेल, अशी खोचक टिप्पणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम (Amit Satam) यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मतचोरीच्या आरोपावरुन जोरदार टीका केली.

राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटले की, राज ठाकरे मतचोरीचा आरोप करतात. मग विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मतं महेश सावंत यांनी चोरली आहेत का? मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरे यांनी केली आहे का, याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन ठाकरे गटाकडून रडगाण्याचा बँड का वाजवला जात आहे? हिंमत असेल तर उबाठाने एकट्याने लढून दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.

बेस्त पतपेढीच्या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आला नव्हता. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनलला 7 जागांवर विजय मिळाला होता.

Ashish Shelar: तरुण नेता मुंबई भाजपचा अध्यक्ष झाला, ही आनंदाची गोष्ट: आशिष शेलार

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केंद्रीय भाजपच्या निर्णयानंतर रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. मुंबई भाजपसाठी हा नवीन अध्याय सुरु झाला आहे. अमित साटम यांनी नगरसेवक, आमदार आणि तळागळातील कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. एक तरुण चेहरा मुंबई भाजपचा अध्यक्ष होतोय, याचा आनंद आहे. मूळ कोकणाची नाळ असलेला आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला आहे. नागरी चळवळीतून उदयोन्मुख चेहरा पुढे आला आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होईल त्यासाठी शुभेच्छा, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

आणखी वाचा

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget