एक्स्प्लोर

Eknath Shinde & Prasad Oak Majha Katta: ‘धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार, माझा कट्ट्यावर बोलताना प्रसाद ओक म्हणाला...

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला.

Eknath Shinde & Prasad Oak Majha Katta : प्रसाद ओक यांना दिघे साहेबांच्या वेशभूषेत पाहून मला पुन्हा दिघे साहेबच माझ्या जवळ असल्याचा अनुभव येत आहे. आनंद दिघे यांनी फक्त ठाण्यासाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी काम केलं आहे. जिथे कुठे कधी संकट यायची दिघे साहेब आणि त्यांची टीम, आम्ही तिथे पोहोचायचो. त्यामुळे त्यांचं काम इतकं प्रचंड होत की, लोक त्यांना देव मनात होते. ते एक समांतर सरकार चालवत होते. म्हणजेच जिथे कोणाला न्याय मिळत नव्हता. अशाना दिघे साहेबानी न्याय मिळून दिला, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला. पहिल्यांदाच एक अभिनेता आणि नेता एक चित्रपटानिमित्त एकाच मंचावर दिसले. शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवासबद्दल शिंदे आणि प्रसाद ओक याने बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. 

पहिल्यांदा आनंद दिघे कुठे भेटले, शिंदे यांनी सांगितली आठवण

आनंद दिघे हे शिंदे यांच्या आयुष्यात कसे आले याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, मी वयाच्या 19 - 20 वर्षांचा असेल. त्यावेळी मी किसन नगर (ठाण्यात) येथे राहत होतो. त्यावेळी तिथे एक प्रसंग घडला होता. एक सत्य नारायण भगत म्हणून एक व्यक्ती होती. तिथे धर्मांतराच्या संदर्भात एक घटना घडली होती. त्यावेळी आम्हाला कोणीतरी सुचवलं होत की, तुम्हाला एकच व्यक्ती न्याय मिळवून देऊ शकते. तेव्हा आम्ही सर्व तरुण टेंबी नाक्यावर पोहोचलो. तिथे समाधान हॉटेल आहे, तिथेच हॉटेल समोर दिघे साहेब खुर्चीवर बसले होते. त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना सांगितलं, त्यावेळी तिथे गेल्यानंतर आणि त्याआधी आलेला अनुभव खूप वेगळा होता. 

आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला

धर्मवीर या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक म्हणाला आहे की, दिघे साहेबांमध्ये कोणते कोणते गुण होते, हे दाखवण्यासाठी या चित्रपटाचा हा एक भाग अपुरा आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून आला पण नाही, मात्र आमच्या मनात याच्या दुसऱ्या भागाची तयारी देखील सुरू झाली आहे. इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. त्यांची एक स्वतःची कार्यशैली होती. कोणाला किती गरज आहे, त्यानुसार त्या माणसाचे काम तातडीने मार्गी लावले जात होते, असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने चित्रपटाचे संवाद देखील बोलून दाखवले आहेत. यातच चित्रपटाची एक संवाद बोलताना तो म्हणाला, ''जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही.''

या चित्रपटातील एका प्रसंगाबद्दल सांगताना प्रसाद ओक म्हणाला की, या चित्रपटात क्षितिज दाते यांनी शिंदे साहेबांची भूमिका साकारली आहे. दिघे आणि शिंदे साहेबांचा नरिमन पॉईंटला शूट झालेला एक सीन आहे. शिंदे साहेब एका प्रसंगामुळे प्रचंड दुःखात असता. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी दिघे साहेब त्यांना नरिमन पॉईंटला घेऊन जातात. ज्यामध्ये दिघे साहेब कृष्ण अर्जुनाप्रमाणे बोलताना दिसतात. या चित्रपटात गुरू-शिष्याची परंपरा जपण्यात आली आहे. ज्यात बाळासाहेब आनंद दिघे आणि दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे असं दाखवण्यात आलं आहे.      

चित्रपटातील याच प्रसंगावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ती आठवण करतानाही मला अवघड होतंय. त्यावेळी आमच्या दोन मुलांचा अपघात झाला गावी. त्यानंतर माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं. मुलं बोटिंग करता असताना अपघात झाला. ज्यात दोन्ही मुलं गेली. त्यावेळी श्रीकांत 14 वर्षाचा होता. ही घटना 2 जून 2000 सालातील आहे. त्यावेळी दिघे साहेब हे एक दिवसआड माझ्याकडे यायचे. ते म्हणाले एकदा काय करतोय, तेव्हा मी म्हणालो काही नाही साहेब आता सर्वच संपलं. त्यावेळी साहेब म्हणाले असं करू नको, त्यांनी मला सावरलं. ज्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझे कुटूंब लहान नाही तर मोठं आहे. लोकांसाठी काम कर. त्यांनी मला त्यावेळी ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी व्यस्त राहावं हे त्यामागचं उद्देश होत. त्यावेळी मी ठाणे महापालिकेचा सभागृहाचा नेता होतो, मात्र ते मला कल्याण, अंबरनाथ आणि इतर जिल्ह्यात पाठवायचे. ते कार्यकर्त्यांना सांगायचे मी येत नाही म्हणून एकनाथला पाठवत आहे. कार्यकर्तेही माझं जल्लोषात स्वागत करायचे. साहेब मला अशीच काम द्यायचे जी अवघड असायची, मात्र मी ती काम पूर्ण करायचो.  यावरून प्रवीण तरडे यांची माफी मागत प्रसाद ओक याने चित्रपटातील एक संवाद म्हणाला, ''एकनाथ ही वेळ महत्वाची आहे. तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पूस, लोकांचा लोकनाथ हो. अनाथांचा एकनाथ हो.''

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Shashi Tharoor: तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Beed : बीड नगरपरिषदेचा विकास का रखडला? नागरिकांच्या समस्या काय?
Harshwardhan Sakpal : महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा देवेंद्र फडणवीस - हर्षवर्धन सपकाळ
Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं
Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका
Eknath Shinde On BJP : नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदा भाजपवर टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Shashi Tharoor: तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घ्या
डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार?
SEBI on Digital Gold : डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं होऊ शकतं नुकसान, सेबीकडून सावधानतेचा इशारा जारी...
डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं होऊ शकतं नुकसान, सेबीकडून सावधानतेचा इशारा जारी...
Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल
भाजप मुंबईचं महापौर मिळवण्यासाठी अर्णव खैरेच्या मृत्यूचं नीच राजकारण करतोय; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
BMC : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
Embed widget