एक्स्प्लोर

Vadhvan Port: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता

Palghar News: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा प्रकल्प हा महाराष्ट्राच्यादृष्टीने गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. या बंदरामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. 30 ऑगस्टला वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प या प्रकल्पाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मात्र, या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून किनारपट्टीवरील स्थानिक या बंदराला विरोध करत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu News) तालुक्यात वाढवण येथे समुद्रात हे बंदर उभारले जाणार असून या बंदरासाठी तब्बल 76 हजार 200 कोटी इतका निधी मंजूर झाला असून केंद्र सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला (Vadhavan port) मंजुरी दिली होती. तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा या बंदराला मंजुरी मिळाली असल्याने बंदराच्या हालचालीला वेग आलेला पाहायला मिळतोय.

येत्या 30 ऑगस्ट ला वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक विविध संघटनांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला असून चक्काजाम आंदोलन , जेल  भरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे सुद्धा दाखवणार असल्याचे युवा संघर्ष समितीचे सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . तर सध्या जेएनपीटीचे कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी काही शासकीय जागा आरक्षित करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे.

वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

वाढवण बंदराच्या प्रत्यक्ष कामाला 2025 मध्ये पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी वाढवण बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. हे काम यंदाच्या सप्टेंबर महिन्यानंतर सुरु होईल. मालाची ने-आण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी 28 गावांमधील 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. याशिवाय, वाढवण येथे 76 हजार 220 कोटी रुपये खर्चुन ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी केली जात आहे. समुद्रात सहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर उभारले जाणार असून त्यासाठी समुद्रात सुमारे 1448 हेक्टर एवढा भराव टाकला जाणार आहे.  या बंदराच्या उभारणीसाठी तब्बल 77 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून 2029 पर्यंत बंदराचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या बंदरामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावा सरकारकडून केला जात असला तरी स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध आहे.

वाढवण बंदरामुळे काय फायदा होणार?

समुद्रकिनाऱ्यावर वीस मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या बंदरामध्ये अजस्त्र कंटेनर्स जहाजे सहज येऊ शकतील. या जहाजांमधून 35 ते 50 हजार टन क्षमतेचा माल एकाएका जहाजातून येथे उतरवला जाऊ शकतो, असं या बंदराचं वैशिष्ट्य आहे. या बंदराचं काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी 76 हजार दोनशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहेत. जवळपास 298 दशलक्ष टन क्षमतेच बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरेल, असे सांगितले जात आहे.

आणखी वाचा

प्रस्तावित वाढवण बंदराला वाढता विरोध, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, शिंदेंचे सभागृहात सर्वात मोठे गौप्यस्फोटCM Fadnavis Call To Nagpur Police | चांगलं काम केलं, नागपूरच्या जखमी डीसीपींना मुख्यमंत्र्यांचा फोनNitesh Rane PC | सुरुवात त्यांनी केली,सरकार धडा शिकवणार! नागपूरच्या घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रियाEknath Shinde PC : लोकभावनेच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget