एक्स्प्लोर

Vadhvan Port: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता

Palghar News: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा प्रकल्प हा महाराष्ट्राच्यादृष्टीने गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. या बंदरामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. 30 ऑगस्टला वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प या प्रकल्पाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मात्र, या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून किनारपट्टीवरील स्थानिक या बंदराला विरोध करत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu News) तालुक्यात वाढवण येथे समुद्रात हे बंदर उभारले जाणार असून या बंदरासाठी तब्बल 76 हजार 200 कोटी इतका निधी मंजूर झाला असून केंद्र सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला (Vadhavan port) मंजुरी दिली होती. तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा या बंदराला मंजुरी मिळाली असल्याने बंदराच्या हालचालीला वेग आलेला पाहायला मिळतोय.

येत्या 30 ऑगस्ट ला वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक विविध संघटनांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला असून चक्काजाम आंदोलन , जेल  भरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे सुद्धा दाखवणार असल्याचे युवा संघर्ष समितीचे सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . तर सध्या जेएनपीटीचे कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी काही शासकीय जागा आरक्षित करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे.

वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

वाढवण बंदराच्या प्रत्यक्ष कामाला 2025 मध्ये पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी वाढवण बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. हे काम यंदाच्या सप्टेंबर महिन्यानंतर सुरु होईल. मालाची ने-आण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी 28 गावांमधील 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. याशिवाय, वाढवण येथे 76 हजार 220 कोटी रुपये खर्चुन ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी केली जात आहे. समुद्रात सहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर उभारले जाणार असून त्यासाठी समुद्रात सुमारे 1448 हेक्टर एवढा भराव टाकला जाणार आहे.  या बंदराच्या उभारणीसाठी तब्बल 77 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून 2029 पर्यंत बंदराचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या बंदरामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावा सरकारकडून केला जात असला तरी स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध आहे.

वाढवण बंदरामुळे काय फायदा होणार?

समुद्रकिनाऱ्यावर वीस मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या बंदरामध्ये अजस्त्र कंटेनर्स जहाजे सहज येऊ शकतील. या जहाजांमधून 35 ते 50 हजार टन क्षमतेचा माल एकाएका जहाजातून येथे उतरवला जाऊ शकतो, असं या बंदराचं वैशिष्ट्य आहे. या बंदराचं काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी 76 हजार दोनशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहेत. जवळपास 298 दशलक्ष टन क्षमतेच बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरेल, असे सांगितले जात आहे.

आणखी वाचा

प्रस्तावित वाढवण बंदराला वाढता विरोध, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget