एक्स्प्लोर

Palghar Rain: पालघर जिल्ह्यातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार, पावसामुळं धरणांमध्ये चांगला पाणीसाठा

Palghar: सततच्या पावसामुळे पालघरमधील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला असून जिल्ह्यातील शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

Palghar News: पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून या धरणाच्या खाली असलेलं कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे. धरण क्षेत्रामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 739 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुख्य धरणांसह पालघर जिल्ह्यातील इतर लहान धरणांमध्ये देखील चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. या धरणांमधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं त्याचप्रमाणे पालघर लगत असलेल्या वसई-विरार (Vasai-Virar) महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महानगरपालिकेला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पालघर जिल्ह्याबरोबरच वसई-विरार महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्नही लवकरच सुटणार आहे.

दुसरीकडे पावसामुळे पालघरच्या गावपाड्यातील रस्ते बंद

पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आणि त्याच्या अभावामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बंद होतात, असाच काहीसा प्रकार पालघर (Palghar) जिल्ह्यात घडला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि गावागावांतील रस्तेही बंद झाले आहेत. पालघरच्या विक्रमगडमधील (Vikramgad) दोन महिन्याच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रस्ते बंद असल्याने चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू

पावसामुळे नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाटच बंद झाली. रस्ता बंद झाल्यामुळे चिमुकलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

विक्रमगडमधील मलवाडा म्हसेपाडा येथील लावण्या नितीन चव्हाण ही चिमुकली दोन दिवसांपूर्वी अचानक तापामुळे आजारी पडली. त्यानंतर श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात म्हसेपाड्याला गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांचे पाणी वेढा घालत असल्याने पाड्याबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मलवाडा म्हसेपाड्याला जोडणारा नदीवरील लहान बंधारा पाण्याखाली गेला होता.

पन्नासपेक्षा अधिक कुटुंबांची वस्ती असलेल्या या पाड्याला चारही बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढा घातला असल्याने या चिमुकलीला घेऊन कुटुंबियांनी आड रस्त्याने प्रवास सुरू केला. हा आड रस्ता लांबून असल्याने रुग्णालयात पोहचण्याआधीच या मुलीचा मृत्यू झाला. या मयत चिमुकलीच्या मृतदेहाचं विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

हेही वाचा:

Palghar: बावडा गावात बिबट्याची दहशत; गावकरी भीतीच्या सावटाखाली

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Vasai Virar Rain : पावसाच्या तांडवात मानवतेचा हात; चादरीच्या स्ट्रेचरवरून तरुणीला नेलं रुग्णालयात; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं
पावसाच्या तांडवात मानवतेचा हात; चादरीच्या स्ट्रेचरवरून तरुणीला नेलं रुग्णालयात; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं
Vasai Virar Rain News: नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget