एक्स्प्लोर

Palghar Rain : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! भातशेतीसह बागायती शेती आणि घरांचंही नुकसान

Palghar News : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीसह बागायती शेती, घरं आणि जिल्ह्यातील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Palghar Rain Loss : पालघर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला विशेषतः पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीसह बागायती शेती, घरं आणि जिल्ह्यातील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भात शेती केली जाते तर, उर्वरित क्षेत्रावर बागायती शेती होते. पालघर जिल्ह्याबरोबरच जव्हार तालुक्यातील वडोली खरोंडा पिंपळशेत या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे काही वेळातच नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी थेट गावामध्ये शिरलं आहे. काही वेळातच आताच रोपणी झालेल्या भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

शेती, घरांसह रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात

दुसरीकडे काही क्षणातच याच पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं त्यामुळे घरामधील माणसांनी कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी टेकड्यांवरती पळ काढला या पुराच्या पाण्यामुळे घरातील सामाना बरोबरच जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्र आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचही मोठ्या नुकसान झालं असून घरामध्ये चिखलमय वातावरण झालं आहे. सध्या काही कुटुंबांना खाण्यासाठी काही उरलं नाही त्यामुळे ही पूरग्रस्त कुटुंब मेटाकुटीला कुठे आले आहेत तर दोन दिवस उलटूनही कोणतीही शासकीय यंत्रणा इथे पोहोचलेली नाही.

भात शेती आणि बागायतदारांचं नुकसान

दरम्यान, भात शेती बरोबरच बागायती शेतीचही अतोनात नुकसान झालं आहे. लाखो रुपये खर्च आणि कष्ट करून जोपासलेली बागायती शेतीचं काही वेळातच होत्याच नव्हतं झालं. वडोलीमधील केळी, पपई बागायतदारांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती ,बागायती शेती बरोबरच घर आणि रस्त्यांचही मोठ नुकसान झालं असून मायबाप सरकार या नुकसानी कडे लक्ष देऊन मदत करतील का अशी याचना आत्ता पालघर मधील शेतकरी आणि नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येतं आहे.

धामणी धरणाचे पाचही दरवाजे पुन्हा बंद

पालघर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले असून सूर्या नदीत होणारा पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. मात्र कवडास धरणातून 7179 क्यूसेक पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. धरण क्षेत्रात आज 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली  असून आत्तापर्यंत एकूण 3015  पाऊस नोंदवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस होता यामुळे सूर्या नदीला पूर आला होता. या पुरामुळे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Embed widget