एक्स्प्लोर

पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस

या घटनेला मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी जोडत आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Palghar: पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व परिसरात 27 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या चार मजली इमारत दुर्घटनेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेला मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी जोडत आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी बांधलेली ही रचना बेकायदेशीर होती, तरीदेखील रहिवासी वसई-विरार शहर महानगरपालिकेला नियमित कर भरत होते. रहिवाशांना असे वाटत होते की नोटरीकृत कागदपत्रांनुसार ही इमारत अधिकृत आहे. यामुळेच त्यांनी या घरात निर्धास्तपणे वास्तव्य केले होते. 

नेमकं घडलं काय होतं?

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्यामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. स्थानिक महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे विरार येथील रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग कोसळला. प्रशासनाने पूर्वी रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी तब्बल तीन वेळा नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, या सर्व इशाऱ्यांकडे रहिवाशांनी दुर्लक्ष केले. या चार मजली इमारतीत सुमारे 50 फ्लॅट आणि 6 दुकाने होती. कोसळलेल्या भागात 12 फ्लॅट असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीचा मागील भाग अचानक कोसळल्याने मोठी मानवी हानी झाली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस

मानवाधिकार आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे की, जर माध्यमांमधील वृत्तातला मजकूर खरा असेल तर तो मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर प्रश्न उपस्थित करतो. म्हणून, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे आणि दोन आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांमध्ये आक्रोश पसरला असून स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापालिकेच्या पातळीवर तातडीने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे आणि त्यांच्याशी संबंधित प्रशासनिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाने या प्रकरणातील जबाबदार अधिकारी, कंत्राटदार आणि इतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget