एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा वाढणार? ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास कुणबी सेनेचा विरोध

Maratha Reservation OBC : ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत असेल तर कुणबी सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. 

पालघर : आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला कुणबी ( Kunbi Caste ) जात प्रमाणपत्र देत ओबीसी कोट्यातून (OBC Reservation) आरक्षण देण्याची मागणी होत आहे. तर, दुसरीकडे त्याला विरोधही होऊ लागला आहे.  कुणबी सेनेचा मराठा आरक्षणाला कोणताही विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत असेल तर कुणबी सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत बोईसर मधील आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून धुमश्चक्री सुरू आहे. ह्या वादामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे असे म्हटले आहे. आम्ही कुणबी सेनेच्यावतीने तीव्र निषेध करत असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी म्हटले. ओबीसी समूहातील 300 हून अधिक जाती आहेत. त्यात कुणबी समाजाला न्याय मिळत नाही.  पेसा सारख्या कायद्यामुळे आमचं आरक्षण शून्यावर आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे कुणबी प्रमाणपत्रावर,  ओबीसी कोट्यातून दिले जात असेल तर कुणबी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला. 

मराठा आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची; आठवले यांचे प्रतिपादन 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पालघरमध्ये केले.  पालघर येथी रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्याला आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले असून आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचं आठवले यावेळी म्हणाले .

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हे पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचा वक्तव्य ही रामदास आठवले यांनी यावेळी केलं. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असून आपण शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. 2009 च्या निवडणुकीत आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला असला तरी सध्या आपला तेथे जनसंपर्क चांगला असून यावेळेस निश्चितच निवडून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. 

इतर संबंधित बातमी :

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Embed widget