एक्स्प्लोर

Palghar : बळीराजाची डोकेदुखी वाढली, जिल्ह्यातील शेतकरी खेकड्यांमुळे त्रस्त

एकीकडे पावसाचा जोर ओसरला आहे तर दुसरीकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या खेकडा सतावत असून येथील खेकड्यांमुळे जिल्ह्यातील शेती संकटात आली आहे.

Palghar News : पालघर जिल्ह्यात भात शेती हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. जिल्ह्यातील अनेक लोकांची कुटुंबे या भाताच्या शेतीवर चालतात. भात शेतीवर पालघर जिल्ह्यातील हजारो कुटुंब आपला वार्षिक उदरनिर्वाह करतात. सतत पडणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या रोपण्या पूर्ण केल्या आहेत. पण एकीकडे पावसाचा जोर ओसरला आहे तर दुसरीकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या खेकडा सतावत असून येथील खेकड्यांमुळे जिल्ह्यातील शेती संकटात आली आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात 75 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर दरवर्षी भात लागवड केली जाते. आजही पालघरच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जात असून आताच शेतकऱ्यांनी आपली भात रोपणाची कामं पूर्ण केली आहेत. आतापर्यंत या भात पिकांवर कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला नसला तरी सध्या जिल्ह्यातील शेतकरी खेकड्यांमुळे त्रस्त आहेत. शेतीच्या सकल भागात खेकड्यांचा प्रादूर्भाव वाढला असून येथील खेकडे सध्या रोप नष्ट करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत . 

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जात असून जव्हार, मोखाडा,  विक्रमगड, डहाणू, तलासरी या परिसरात भात शेती हा येथील कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र मुसळधार पावसामुळे वाढलेल्या खेकड्यांची संख्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यावर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या खेकड्यांची विल्हेवाट लावण्याचं आवाहन कोसबाड कृषी केंद्रामार्फत करण्यात आलं आहे. खेकड्यांचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणी पक्षांची घरटी तयार करणे, रात्रीच्या सुमारास सतत टॉर्च किंवा कंदील घेऊन फिरणे, तसंच विविध औषधांचा वापर करून खेकडे नष्ट करणे हे यावर मूळ उपाय असल्याचं सुद्धा तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. 

पालघरच्या ग्रामीण भागात आजही खेकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून हेच खेकडे सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे हे खेकडे लहान असतानाच नष्ट करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय. मात्र यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि औषध वाटप करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मात्र शेतातील खेकड्यांचे वाढते प्रमाण पाहता शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास  हिरावून घेतात की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

पिझ्झा, बर्गर आणि बेकरी प्रोडक्ट खाताय? अधिक सेवनाने वाढतोय मृत्यूचा धोका, दरवर्षी 5.40 लाख लोक बळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer karjmafi : यंदा कर्जमाफी नाही,अजितदादांचं वक्तव्य, विरोधकांची सरकारवर सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 March 2025Job Majha : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Embed widget