एक्स्प्लोर

ऑनलाईन तूर खरेदी म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’

एकूण काय तर गतवर्षीपेक्षा अचानकपणे राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्याचा तुरीचा कापणी अहवाल कमी आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी जीवाचे रान करुन आपली उत्पादन क्षमता वाढवली, त्याच्यावर या निर्णयामुळे हवालदिल होण्याची वेळ आली आहे.

लातूर : मागील दोन वर्षात तुरीने सरकारला आणि शेतकऱ्यांना बेजार केले आहे. ऑनलाईन तूर खरेदी केंद्र सुरु झाली आहेत, मात्र नवीन धोरणामुळे या केंद्राकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. सध्या या केंद्राची अवस्था ही ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. कापणी अहवालावर आधारित तूर खरेदीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. लातूर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून तुरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी तूर घेतली, उत्पादनही चांगले आले. उतारा एकरी सात ते दहा पोते आला आहे. मात्र गतवर्षी तूर खरेदी केंद्रावर हेक्टरी 25 क्विंटलपर्यंत मर्यादा होती, ती आता 12 क्विंटल 30 किलोवर आणली आहे. त्यात पुन्हा ग्रेडेशन, पोत्याची पॅकिंग, टॅग असे प्रकार आहेत. तूर बाजारात आणून शेतकऱ्यांनी कधीच विकली आहे. आता मालाची आवक घटत असताना तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचा घाट सरकारने घातल्याने शेतकरी, जाचक नियमावलीमुळे अधिकारीवर्ग त्रस्त आहे. कमी केलेल्या खरेदी मर्यादेमुळे शेतकरी या केंद्रांकडे फिरकतच नाहीत. जिल्ह्यात दहा केंद्र आहेत, त्यात 17 हजार 638 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एकूण काय तर गतवर्षीपेक्षा अचानकपणे राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्याचा तुरीचा कापणी अहवाल कमी आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी जीवाचे रान करुन आपली उत्पादन क्षमता वाढवली, त्याच्यावर या निर्णयामुळे हवालदिल होण्याची वेळ आली आहे. कापणी अहवालावरच त्या त्या जिल्ह्यात तूर खरेदी करण्याचे सरकारचे आदेश आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात गतवर्षी 10 क्विंटल मर्यादा, यंदा साडेसात क्विंटल, तर लातुरात 25 क्विंटलवरुन 12 क्विंटलवर मर्यादा आणली आहे. अशी परस्थिती राज्यातील 159 खरेदी केंद्रावर आहे. लातुरात एकीकडे लेखी आदेश 12  क्विंटल असताना एजंटला मात्र 10 क्विंटलचेच तूर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यातून फक्त सरकारला तूर खरेदी केंद्राचे नाटक करत वेळ मारुन नेण्याचे धोरण राबवायचे की काय, अशी स्थिती आहे. ज्यावेळेस तुरीचे भाव वाढले होते, त्यावेळी सरकारने मोठ्या प्रमाणावर तूर आयात केली होती. त्याच दरम्यान देशात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले होते. यावर्षी सरकारने 5 हजार 450 हमीभाव जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात बाजारभाव हा 4 हजार 600 पेक्षा जास्त मिळत नाही. तूर खरेदी केंद्र उशिरा सुरु झालेत. शेतकऱ्यांनी भाव पडतील या भीतीपोटी माल विकला आहे. या फरकाची रक्कम सरकारने द्यावी आणि मर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहेत. उत्पादन वाढवा शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल, असे सरकार सांगतं आहे. मात्र त्याच वेळी कापणी अहवालाचा आधार घेऊन तूर खरेदीची मर्यादा घटवत आहे. त्यातच जाचक अटी टाकल्यामुळे सरकारी अधिकारी यांच्यात निराशा आहेत. तोंडी आदेश वेगळे आणि लेखी आदेश वेगळे देण्यात येत आहेत. त्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Not Reachable For Next 15 Days: प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल, नेमकं घडलंय काय? इन्स्टा स्टोरी पाहून चाहत्यांना धक्का!
प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल, नेमकं घडलंय काय? इन्स्टा स्टोरी पाहून चाहत्यांना धक्का!
T20 World Cup 2026 Semi Final Scenarios : इंग्लंडने ताटात दिलं, पण पाऊस करणार पाकिस्तान गेम! SL vs PAK सामन्यात रद्द झाला तर कोण जाणार सेमीफायनलमध्ये?, जाणून घ्या समीकरण
इंग्लंडने ताटात दिलं, पण पाऊस करणार पाकिस्तान गेम! SL vs PAK सामन्यात रद्द झाला तर कोण जाणार सेमीफायनलमध्ये?, जाणून घ्या समीकरण
Shani Ast 2026 : होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य
होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य
Bhiwandi Election 2026 : भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची 6 बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस
भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी धाडली 6 बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Ideas of India 2026: मुंबई महापालिकेच्या ठेवी विकासकामांसाठी वापरणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंवरही टीका
मुंबई महापालिकेच्या ठेवी विकासकामांसाठीच वापरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंवरही टीका
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला  
अजितदादा म्हणालेले एक आमदार सोडून सर्वजण मी सांगेल तिथं सही करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Embed widget