एक्स्प्लोर

MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही

MPSC Student Viral Video : जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंत्यांची परीक्षा उत्तीर्ण होऊनही तरूणाला मेंढ्या हाकाव्या लागत आहेत. 

नाशिक: एमपीएससी परीक्षा (MPSC) उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तरूण घरदार सोडून वर्षानुवर्षे तयारी करताना आपल्या आजूबाजूला दिसतात. त्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अक्षरशः जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही हा संघर्ष संपत नसल्याचं चित्र आहे. एमपीएससीतून जलसंपदा विभागातील सहायक अभियंत्याती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही एका युवकावर मेंढ्या हाकण्याची वेळ आली आहे. श्रावण गांजे असं या तरूणाचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (MPSC Student Viral Video) झाल्यानंतर हे चित्र समोर आलं.  

श्रावण गांजे हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अजंग या गावचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत अभियांत्रिकी सेवा 2020 अंतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता या पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून जलसंपदा विभागात त्याची निवड झाली होती. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करत त्याने हे यश मिळवले. या परीक्षेचा अंतिम निकाल 12 ऑगस्ट 2022 रोजी लागला होता. परंतु एक वर्षे उलटूनही अजून त्याला नियुक्ती दिली गेली नाही.

सध्या नोकरी नाही म्हणून हा तरुण आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळला असून तो मेंढ्या चारण्याचे काम करतो आहे. त्यासंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझा मालेगावातील अजंग या गावी पोहोचला. 

कोणतीही स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला तीन महिन्याच्या आता पोस्टिंग देण्यात यावी असा शासनाचा नियम आहे. पण दीड वर्षे झाली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना नियुक्ती दिली जात नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा मंत्रालयात करण्यात येत असल्याचं श्रावण गांजे याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

MPSC Student Viral Video : का रखडली नियुक्ती? 

या नियुक्त्या का रखडल्या असा प्रश्न विचारल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गाचे कारण दिले जात असल्याचं श्रावण गांजे याने सांगितलं. तो म्हणाला की, न्यायालयानेही एसईबीसी आरक्षणासंबधी निकाल देताना सांगितलं होतं की हे 10 टक्के उमेदवार सोडून इतर 90 टक्के उमेदवारांना नियुक्त्या द्या. पण शासन त्याची अंमलबजावणी करत नाही.

या नियुक्त्या लवकर देण्यात याव्यात अशी मागणी करत येत्या 2 ऑक्टोबर पासून सर्व उत्तीर्ण उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं श्रावण गांजे यांने सांगितलं. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असून त्यांना पोटापाण्यासाठी काहीतरी काम करावं लागत असल्याचं श्रावण गांजे यांने सांगितलं. 

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश

व्हिडीओ

NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BMC Election 2026: राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget