एक्स्प्लोर

ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर

Dada Bhuse : नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याचे मोठे आव्हान दादा भुसे यांच्यावर आहे.

नाशिक : शिक्षण (Education) हे वाघिणीचे दूध समजले आहे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिक्षण आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. गोरगरीब नागरिकांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून सरकारकडून सरकारी शाळा उपलब्ध आहेत. मात्र सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाच्या खाजगीकरणात मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा टिकवणे हे आता मोठे आव्हान होत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची (ZP School) अवस्था अतिशय बिकट असल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाडगाव या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करवंदेवाडी आणि वाडगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील शिक्षण विभागाची जबाबदारी आता नाशिकवर आहे अर्थात शिक्षण खाते दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे आहे. त्यामुळे सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याचे मोठे आव्हान दादा भुसे यांच्यावर आहे. मागील अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सरकारी शाळा डिजिटल झाल्याचे बोलले गेले. मात्र नाशिक शहरालगत असलेल्या वाडगाव येथील शाळांची भीषण परिस्थिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शाळांची आकडेवारी

  • जिल्हा परिषद - 3261
  • महनगरपालिका - 183
  • नगर पालिका - 23
  • अनुदानित शाळा - 1275
  • खाजगी शाळा - 840
  • एकूण - 5582 शाळा आहेत
  • 9 लाख 13 हजार 789 विद्यार्थी.  

जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण 

नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या वाडगाव येथील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रोजेक्टर आहे. मात्र, इंटरनेट व्यवस्था नाही. शाळेच्या भिंती तर कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. त्यातच लहान मुले जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेला इमारत मिळावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळे साहित्य मिळावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असली तरी देखील आम्ही कोणतीही अडचण लक्षात न घेता मुलांना घडवण्याचं काम करत असल्याचं प्रामाणिक मत व्यक्त केले आहे. 

काटेरी कुंपणाने शाळेला तटबंदी 

तर करवंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सुरक्षा भिंतच नसल्याचे दिसून आले आहे. काटेरी कुंपणाने या शाळेला तटबंदी केल्याचे पाहायला मिळाले. या शाळेच्या भिंतीला लागूनच शेती आहे आणि या ठिकाणी बिबट्याचा देखील वावर असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून शाळेत मुलांना पाठवले तर काही अनुचित प्रकार होऊ नये, अशी भीती देखील व्यक्त होत आहे. 

दादा भुसे काय उपाययोजना करणार? 

दरम्यान, ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांचे मुलं या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात. खरंतर सरकारी शाळा स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असले तरी मुलं विविध ठिकाणी शाळेचे नाव उंचावत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना इतर शहरी मुलांप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर शाळा मिळेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता नाशिकवर आहे. त्यामुळे आता नव्याने शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारलेल्या दादा भुसे यांना येत्या काळात सरकारी शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी स्वतःच्याच जिल्ह्यातून सुरुवात करावी लागेल हे मात्र तितकेच खरे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी दादा भुसे काय उपाययोजना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget