एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : ...तर नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता; राहुल गांधीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले...

Nashik Sanjay Raut : आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे, त्यांच्यावर दबाव आणतात, पक्ष फोडतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Nashik Sanjay Raut : आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे. त्यांच्यावर दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात असल्याची गंभीर टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. 

संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर जात असून रविवारी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा होत असल्याने पाहणीसाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे, त्यांच्या चूक शोधून काढतात, आणि नसलेल्या चुकाना मोठे स्वरूप देऊन कारवाया केल्या जातात. दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले. 

किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्या ट्विटवर संजय राऊत म्हणाले कि, मुंबई विद्यापीठ, न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर किती विश्वास ठेवायचा अशी आज परिस्थिती आहे. ही सगळी त्यांची दुकानदारी असून सगळ्या यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या सत्तेच्या टाचेखाली काम करतात, हे कालच्या सुरतच्या निकालावरून स्पष्ट झाले.  ईडी, सीबीआय आणि शैक्षणिक संस्था देखील कश्या कोणाच्या दबावाखाली काम करतात हे देखील स्पष्ट झाले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यावर म्हणाले कि, जस त्यांच्या नेत्यांचा भाषण स्क्रिप्टड होते, तस आहे का? शिवसेनेला स्क्रिपटेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वातंत्र्य बुद्धीने विचाराने काम करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा असून आम्हाला दुसऱ्यांची डोके कामाला लागत नाही, टोला मनसेला लगावला आहे. 

सूड आणि बदलाचे राजकारण.... 

ईडी, सीबीआय या संदर्भात चौदा पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात शिवसेना देखील आहे. त्यात चुकीचे काय? असा सवाल करत सर्वच यंत्रणा आजच्या सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. भ्रष्टाचार एकाच पक्षाचा नसतो. सत्तेवर जे असतात, त्यांचा भ्रष्टाचार जास्त असतो. आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूक शोधून काढतात,आणि नसलेल्या चुकाना मोठे स्वरूप देऊन कारवाया केल्या जातात. दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात आहे. 

ईव्हीएमसंदर्भांत दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.... 

दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. याबाबत संजय राऊत म्हणाले कि, कालची बैठक निवडुन आयोग जस काम करत आहे. इलेक्शन कमिशन लोकशाहीचा मोठा कणा असून मात्र मोदी सरकरने लोकशाहीचा कणा मोडून काढला. ज्या बाबतीत शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक आयोगाने ही सरळ सरळ लफंगे गिरी, दरोडे खोरी सुरु आहे. त्याचबरोबर ईव्हीएमसंदर्भांत लोकांच्या मनात शंका असून कपिल सिब्बल यांनी पुढाकार घेतला आहे. इलेक्शन कमिशनची मनमानी सुरु असल्याने याबाबत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. ईव्हीएम संदर्भातली भूमिका आजची नाही. किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी या दोन महान वीरांनीच  ईव्हीएमबाबत पहिले आवाज उठवला होता.  ईव्हीएम हा कसा घोटाळा आहे. याबाबत सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. किरीट सोमय्या यांनी बाळासाहेबांच्या उपस्थितीत हैद्राबादचे तज्ञ आणले होते. हा ईव्हीएम घोटाळा कसा आहे हे दाखवले होते. 

नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता.... 

दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या संदर्भात राऊत म्हणाले कि, सरन्यायाधीश यांना मर्यादा असून राहुल गांधी यांना ज्या खटल्यात 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. ती नरेंद्र मोदी यांची बदनामी असेल असं वाटत असेल तर, नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी येते खटला दाखल करते, सुरत न्यायालय यावर निर्णय देते हा काय प्रकार? कशासाठी चालले हे सगळं? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द करावी, यासाठी हा सगळा आटा पिटा चालला असल्याचे सांगत विरोधकांवर दहशत निर्माण व्हावी, यासाठी हा सुरतचा निकाल असून मात्र संपूर्ण विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या सोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Embed widget