एक्स्प्लोर

Nashik Drought : फक्त पिकासाठी! नाशिकमध्ये पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ, शेतकरी संकटात!

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे.

नाशिक : महाराष्ट्रात दुष्काळ (Maharashtra Drought) जाहीर करा अशी मागणी सध्या जोर धरु लागलेली असतानाच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दुष्काळाचे एक भीषण वास्तव समोर आले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिण्याच्या पाण्याची (Water Crisis) अडचण निर्माण झाली आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. एवढंच काय तर गावातल्या मुलामुलींची लग्नही लांबल्याचं शेतकरी सांगत आहेत. 

कृषीप्रधान जिल्हा म्हणून खरंतर नाशिकची (Nashik District) ओळख. निसर्गाचं वरदान लाभलेला परिसर म्हणून नाशिकची ओळख. मात्र याच नाशिक जिल्ह्यातील अनेक भाग हा पावसाळ्यात कोरडाठाक पडत चालला आहे. अनेक गावं सध्या तहानलेली असून पावसाने पाठ फिरवल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान चांदवड (Chandwad) तालुक्यातील निमगावमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याचे दोन ते तीन दिवस शिल्लक असून समाधानकारक पाऊस न झाल्याने चक्क पिकांना तांब्या-तांब्याने पाणी देण्याची वेळ शांताराम गांगुर्डे आणि सुनीता गांगुर्डे या झेंडूची शेती करणाऱ्या दाम्पत्यावर आली आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन हजार झेंडूची रोपं लावली होती. मात्र पाऊसच नसल्याने गांगुर्डे दाम्पत्याला टँकरने पाणी मागवून ते विहिरीत तसेच ड्रममध्ये भरावे लागते आणि त्यानंतर दिवसातून दोन वेळा असे पाणी दिले जाते. आजवर पहिल्यांदाच अशी वेळ आमच्यावर आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. 

निमगावपासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उर्दूळ गावी तर उन्हाळ्यात दुष्काळ पडतो. तशी परिस्थिती ऑगस्टच्या शेवटी निर्माण झाली आहे. पिकं, जनावरांसाठीच काय पण पिण्यासाठीही पाणी नसल्याने शेतकऱ्यांना चार हजार रुपये खर्च करत आठवड्यातून एकदा टँकर बोलवावे लागतात. विशेष म्हणजे पाण्याची मागणी वाढल्याने टँकरसाठीही त्यांना 4-5 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं गावचे शेतकरी मनोहर कुटे सांगतात, रात्रीच्या वेळी टँकर आले तर शेतकऱ्यांची अर्धी रात्र या कामातच निघून जाते.

लासलगावजवळील (Lasalgaon) उर्दूळ गावचेच भाऊसाहेब कुटे स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहेत. शेतात कांदा लावण्यासाठी त्यांनी यंदा रोपं तर घेतली मात्र पाऊसच नसल्याने अक्षरशः ती रोपं जळून गेली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क (Onion Export) लागू करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याची भावना कुटे यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पाऊस नाही, त्यामुळे पिके घेता येत नाही आणि यामुळे आमचे अर्थकारण बिघडले असून नातेवाईकांमधील अनेकांची लग्नही होत नसल्याचं ते सांगतात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून आजमितीस 6 तालुक्यातील 236 गावे आणि वाड्यांना 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय. पाऊस लांबल्यास आणखी परिस्थिती भीषण होण्याची चिन्ह असून दुष्काळ लागू करण्याची मागणी बळीराजा करु लागला आहे. वरुणराजाने आता सर्वांची परीक्षा थांबवावी आणि लवकरात लवकर कृपादृष्टी दाखवावी, अशीच प्रार्थना शेतकऱ्यांकडून देवाकडे करण्यात येत आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

पावसाची दडी! पिकं वाचवण्यासाठी तांब्याने पाणी घालण्याची वेळ, थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar on Manoj Jarange Patil: 'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Embed widget