![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील जलकुंभांसह पाण्याच्या स्त्राेतांचे शुद्धीकरण, जिल्हा परिषदेचे मान्सूनपूर्व अभियान
Nashik News : पाऊस तोंडावर आल्याने नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात जलकुंभांसह पाण्याच्या स्त्राेतांचे शुद्धीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.
![Nashik News : नाशिक जिल्ह्यातील जलकुंभांसह पाण्याच्या स्त्राेतांचे शुद्धीकरण, जिल्हा परिषदेचे मान्सूनपूर्व अभियान Maharashtra news Purification of water sources including water tanks in Nashik district Nashik News : नाशिक जिल्ह्यातील जलकुंभांसह पाण्याच्या स्त्राेतांचे शुद्धीकरण, जिल्हा परिषदेचे मान्सूनपूर्व अभियान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/68767d5e6b832a05d3639544a8c636b5_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत 25 मे ते 10 जून या कालावधीत जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविणेबाबतचे निर्देश सर्व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. मान्सून सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 25 मे ते 10 जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते, त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविणे आवश्यक असून यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी जिल्ह्यात सलग पाचव्या वर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे तसेच. पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात, अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करण्यासाठी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा तसेच तालुकास्तरावरुन दैनंदिन स्वरुपात अभियानाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे..
एक कोरडा दिवस सदर अभियानासाठी गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, उपअभियंता (ग्रापापु) यांच्यासह ग्रामस्तरावरील कर्मचारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा तसेच ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून, त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख आँईलपेंटने नमूद करावी, पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे हा उददेश
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या कि पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हयात सर्व जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या 5 प्रमुख विभागांचा समावेश आहे. या अभियानात सर्व यंत्रणांनी सहभागी होऊन कोणताही जलजन्य साथीचे आजार होऊ नये यासाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)