एक्स्प्लोर

Nashik On Gujrat Election : 'इलेक्शनचा नाय फरक पडत, पोटापूरता मिळाला ना की बास', गुजरात सीमेवरील नागरिक म्हणाले... 

Nashik On Gujrat Election : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेवरील गावकरी म्हणाले...

Nashik On Gujrat Election : 'आमच्याव इलेक्शनचा नाय फरक पडत, ज्या आपल्याआढ हाय, त्याचं ते बाजूनी हाये, कोण आला कोण गेला, आम्हाला पडेल न्हाय, आमचा काम अन आम्ही' आपले सरकारला आम्ही काय जास्त मागत नाय, थोडा पोटापूरता मिळाला ना की बास' हे बोल आहेत नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेवर असलेल्या गावकऱ्यांचे. 

आज सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचा (Gujrat Election) निकाल लागला असून भाजपने बहुमत घेतल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर ठिकठिकाणी विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यातील गुजरात सीमेवरील गावांशी चर्चा केल्यानंतर फारसा पडला नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. गुजरात राज्यातील गावांपेक्षा आपल्या गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे, हे महाराष्ट्र सरकार सुद्धा नाकारू शकत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ तालुके गुजरात सीमेवर आहेत. नुकताच सुरगाणा तालुक्यातील काही गुजरात सीमेवरील गावांनी गुजरात राज्यात विलीन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला होता. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा या मागणीनंतर गुजरात सीमेवर असलेल्या गावांच्या दुरावस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे दोन चार किलोमीटर असलेल्या गुजरात राज्यातील गावांना सर्व सोयीसुविधा मिळत असतांना मात्र महाराष्ट्रात असलेल्या गुजरात सीमेवरील गावांना मात्र आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वेळोवेळी जाणवते. 

सुरगाणा तालुक्यातील पांगरने, खुंटविहिर, कातळपाडा, रगतविहीर, श्रीभुवन, बर्डीपाडा, कुकडणे यासारखी अनेक गावे गुजरात सीमेवर आहेत. आजच्या इलेक्शन संदर्भांत या गावांशी चर्चा केल्यानंतर फारसा फरक पडला नसल्याचे ते म्हणाले. तर इकडे पेठ तालुक्यातील नालशेत, पिठूंडी, कळंमपाडा, सादडपाडा (रानविहीर), डौलपाडा, राजबारी ही गावे देखील एक ते दोन किलोमीटरवर आहेत. ही गावे देखील पायभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र आम्ही आमच्या कामात खुश आहोत, आम्हाला कोण आला, कोण गेला काही फरक नाही, आम्ही गुजरात जायचं ठरलं तर जातो, नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी कामकाज करत असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग गुजरात राज्याच्या सीमेवर आहे. यामध्ये कसोली, कास, घोडमाणी, पाटाचा माळ ही गावे अवघ्या गुजरात सीमेपासून पाचशे मीटरवर आहेत. देवडोंगरा, ओझरखेड याचबरोबर इतरही गावे आहेत. या गावातील नागरिकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आमच्या लोकांकडे लक्ष द्यायला हवे, मग गुजरात राज्यात जाण्याची गरज पडणार नाही, इलेक्शन सगळीकडे सारखच, मात्र बाजूच्या सर्व सुख सुविधा आपण वंचित का? असा प्रश्न पडतो. पण सांगणार कोणाला? इकडे तर आपले मंत्रीही फिरत नाहीत, मात्र आम्ही आमच्या आयुष्यात समाधानी असल्याचे गावकरी म्हणाले. 

एकूणच आज गुजरात इलेक्शन पार पडले. भाजपने एकहाती सत्ता मिळवली. मात्र या इलेक्शनचा महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नागरिकांना फारसा फरक पडला नसल्याचे दिसते. मात्र गुजरात राज्यातील गावांप्रमाणेच आमच्याही गावात शिक्षण, आरोग्य, पाणी असायला हवे, अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र  सरकारने याबाबत विचार करणे महत्वाचे असल्याचे दिसून येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget