एक्स्प्लोर

Nashik Conservation : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला मिळालं सुरक्षा कवच, संवर्धन क्षेत्र म्हणजे नेमकं काय? 

Nashik Conservation : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळालं असून संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. 

Nashik Conservation : गोदावरी नदीचे (Godavari River) उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या तसेच पर्यटनासाठी लाखो भाविक भेट देत असलेल्या त्र्यंबकेश्वरचे 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकच्या (Trimbakeshwer) ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळालं असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवण चा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. 

नुकतेच महाराष्ट्र सरकारने वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ (Conservation Forest)  हा दर्जा बहाल केला असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह 97 किलोमीटर, यामध्ये वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर आदी परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यात त्र्यंबकच्या मागील बाजूस ब्रम्हगिरीला सुरुंग फोडण्याचे काम सुरु होते. यास आता आळा बसणार आहे. या निमित्ताने ब्रम्हगिरीला एकप्रकारे कवच मिळाले असून भूमाफियांच्या चोरीला चाप बसणार आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्रह्मगिरी (Bramhgiri) पर्वताच्या मागील बाजूस सुरू असणाऱ्या अवैध उत्खनन बाबत एबीपी माझाने आवाज उठविला होता. त्या बातमीनंतर या भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीं होती. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली होती. मात्र आता यावर राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेत ब्रहमगिरी पर्वताला प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा देखील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने आता प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही उत्खनन करता येणार नसल्याचा निर्वाळा या निर्णयाने होणार आहे. 

निसर्ग प्रेमींच्या लढ्याला यश
गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी भागात होणाऱ्या उत्खननावर निसर्गप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर हा विषय कोर्टापर्यंत गेला होता. यासाठी पर्यावरण प्रेमींनी सातत्याने लढा दिला होता. तर जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह वनमंत्री, वन सचिव आणि सर्व प्रेमींची बैठक पार पडली होती. निसर्गप्रेमींच्या बैठकीनंतर आता यावर शासनाने राजपत्राद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास शंभर चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रह्मगिरी आणि गंगाद्वारचा परिसर देखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीचे जतन आणि गोदावरीचे पावित्र्य वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मधील पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

त्र्यंबकेश्वरसह कळवण, इगतपुरीचा समावेश 
त्र्यंबकेश्वरसह कळवण तालुक्यातील गुजरातलगतच्या भागासह 84.12 चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्र जाहीर झाले आहे. त्यात गुजरात राज्याच्या हद्दीला लागून सुरू होणाऱ्या कळवण क्षेत्रात संरक्षित क्षेत्रात समावेश झाला आहे. कळवण तालुक्यातील देसरणे, रळवजी, नाकोडे, एकलहरे, वाडी, बालापूर, जामळे, ढेकाळे यांसह 28 गावांतील क्षेत्राचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातील 88.49 चौरस क्षेत्राचा परिसर संरक्षित म्हणून जाहीर झाला आहे. यामध्ये भावली, सातुरली, ओंडली, नागोसली वालविहीर, धारगाव, चिंचले खैरे त्रिंगलवाडी,पिंपळगाव भटाटा, धानोर्ली आडवण, टाके घोटी, बलायदुरी, बोरटेंभे पारदेवी, गिरणारे, टीटोली, इगतपुरी (शहरी), आवळखेड, तळेगाव, तळोशी भावली, कुरुंदवाडी, काळुस्ते आदी परिसर संवर्धन क्षेत्रात समावेश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget