एक्स्प्लोर

Nashik HSC Results : आम्ही पोरी हुशार! नाशिक विभागात मुलींचीच बाजी, विभागात धुळे जिल्हा नंबर वन 

Nashik HSC Results : नाशिक (Nashik) विभागात मुलीनींच बाजी मारली असून विभागात धुळे जिल्ह्याने (Dhule) आघाडी घेतली आहे. तर नाशिक जिल्ह्याची (hsc Result) चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

Nashik HSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारी (दि.०८) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. तर नाशिक विभागात धुळे जिल्ह्याने यंदा आघाडी घेतली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. दरम्यान नाशिक विभागातून यावर्षी ९४.१४ मुलांसह ९६.१७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाणे ०२ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक विभागात यंदा धुळे जिल्ह्याने आघाडी घेतली असून जिल्ह्यातील उतीर्ण विद्या्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. धुळे जिल्ह्यातील ९६.३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबार ९५.६३ टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह दुसऱ्या स्थानी असून जळगाव ९५.४६ उत्तीर्णांसह तिसऱ्या व तर नाशिक जिल्ह्याची टक्केवारी यंदा घसरून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. 

यात नाशिक विभागातून परीक्षेला प्रविष्ट ०१ लाख ६४ हजार २९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ०१ लाख ५४ हजार ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८५ हजार ३७४ मुले (९४.१४ टक्के) व ६७ हजार २५५ (९६.१७) मुलींचा समावेश असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली आहे. तर एकूण विभागाचा निकाल ९५. ०३ टक्के लागला आहे. यामुळे राज्यात नाशिक विभाग सहाव्या स्थानावर गेला आहे. 

नाशिक विभागाचा असा राहिला निकाल 
नाशिक विभागाची बारावीच्या निकालाची मागील आकडेवारी लक्षात घेता यंदा टक्का घसरल्याचे दिसून येते. कारण मागील वर्षी जवळपास ९९ टक्के विभागाचा निकाल होता. मार्च २०१९ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५९ हजार ८९७ होते. यापैकी ०१ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ८४. ७७ टक्के इतकी होती. त्यांनतर मार्च २०२० मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५६ हजार ७८९ होते. यापैकी ०१ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ८८. ८७ टक्के इतकी होती. म्हणजे चार टक्क्याची वाढ झाली होती. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५१ हजार ७५४ होते. यापैकी ०१ लाख ५१ हजार १७३ विद्यार्थी होऊन विभागाची आकडेवारी जवळपास ९९.६१ टक्के इतकी होती. त्यानंतर यंदाच्या निकालात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा मार्च २०२२ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ६४ हजार २९ होते. यापैकी ०१ लाख ५४हजार ७६४ विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ९४. ०३ टक्के इतकी आहे. 

निकाल पहा एबीपी माझावर 
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल चेक करायचाय ना? अगदी सहज आणि सोपी पद्धत जाणून घ्या...

Maharashtra Board 12th HSC Result 2022 : बारावीच्या निकालाबाबत सर्वकाही; वाचा फक्त एका क्लिकवर

https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html   इथे पहा निकाल    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget