एक्स्प्लोर

Nashik Conservation Reserves : नाशिकमध्ये चार नवीन राखीव संवर्धन वनक्षेत्रांना मान्यता, आता उत्खनन थांबणार का?

Nashik Conservation Reserves : नाशिकमध्ये (Nashik) चार नवीन राखीव संवर्धन वन क्षेत्रांना (Conservation Reserves) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांनी मान्यता दिली आहे.

Nashik Conservation Reserves : राज्यात नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार संवर्धन राखीव क्षेत्रांचा समावेश असल्याने परिसरातील विकासात मोलाची भर पडणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजना, जायकवाडी पक्षी अभयारण्य, विस्तारित लोणारसह 03 अभयारण्य यासह अनेक प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील चार ठिकाणांना संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये कळवण (84.12 चौ.कि.मी), मुरागड (42.87 चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी), इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) या ठिकाणाचा समावेश आहे. 

दरम्यान कळवण तालुक्यातील 30 गावे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 33 गावे, आणि इगतपुरी तालुक्यातील 28 गावांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी सलग वनक्षेत्र असेल त्या ठिकाणी राखीव संवर्धन वनक्षेत्र असणार आहे. दरम्यान यासाठी नाशिक जिल्ह्यातून दहा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी चार तालुक्यांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 08 क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या 12 संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

पहिले राखीव वनक्षेत्र बोरगड 
नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेले बोरगड हे राज्यातील सर्वात पहिले राखीव वनक्षेत्र म्हणून ओळखले जाते. बोरगडला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाल्यांनतर राज्यात हि संकल्पना अमलात आणण्यास सुरवात झाली. यापाठोपाठ नाशिकमधील अंजनेरी, राजापूर-ममदापुर हे राखीव वनक्षेत्र आहेत. दरम्यान या निर्णयामुळे आता इथे होणारी जंगलतोड, उत्खनन, चराई इत्यादी गोष्टींना आळा बसणार आहे. 

उत्खनन थांबणं आवश्यक 
जिल्ह्यातील अंजनेरीसह ब्रह्मगिरी आदी ठिकाणे आजही पर्यटकांना आकर्षित करतात. येथील निसर्गरम्य ठिकाण, पावसाळ्यातील आल्हादायक वातावरण मात्र हे सर्व असूनही अलीकडचा काळात या ठिकाणी बेसुमार जंगलतोड आणि उत्खनन सुरु आहे. यामुळे निसर्गाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे. राखी संवर्धन वनक्षेत्र असताना या ठिकाणी अशा पद्धतीने अवैध उत्खनन करून, प्लॉट्स पाडले जात आहेत. रो हाउसेस उभारले जात आहेत. अशावेळी नवीन राखीव संवर्धन क्षेत्र जाहीर करताना येथील नैसर्गिक समतोल राखण्याचा प्रयत्नही होणं आवश्यक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Vidhan Parishad Election 2026: ...तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवसेनेला जागा सुटली पण भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जाने डोकेदुखी वाढली, गणेश गीते माघार घेणार की लढणार?
...तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवसेनेला जागा सुटली पण भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जाने डोकेदुखी वाढली, गणेश गीते माघार घेणार की लढणार?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget