एक्स्प्लोर

Nivruttinath Maharaj Palkhi: इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडीचे एक दिवस आधी होणार प्रस्थान, सुरक्षेच्या दृष्टीने समिती करणार स्थापन

दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनुसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार असून एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे. 

नाशिक : वारकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते, हजारो वारकरी यात सहभागी होत असतात.  मात्र यंदा इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने तसेच दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनुसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार असून एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे. 

दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजेच 2 जूनला होणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांचे गुरू गहीनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी हा मुक्काम असणार आहे. यंदा 2 ते 28 जून या कालावधीत वारी असून त्यात 42 पेक्षा अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज अंदाजे वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते.

 या दरम्यान सतरा मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. म्हणजेच 2 जूनला संत निवृत्तीनाथ पालखी निघेल आणि 28 दिवसांचा पायी प्रवास करून 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, त्यानंतर परतीचा प्रवास 3 जुलै रोजी सुरु होऊन 20 जुलै रोजी पालखीचे त्र्यंबकेश्वरला आगमन होईल. यंदा विशेष म्हणजे उन्हाचा कडाका आणि इतर आरोग्य तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध समित्यांची स्थापनाही निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने केली जाणार आहे. 

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी मार्ग 

त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रका प्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान सतरा मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. म्हणजेच 2 जूनला संत निवृत्तीनाथ पालखी निघेल. 28 दिवसांचा पायी प्रवास करून 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, त्यानंतर परतीचा प्रवास 3 जुलै रोजी सुरु होऊन 20 जुलै रोजी वारकरी पालखी त्र्यंबकेश्वर आगमन होईल.  म्हणजेच पालखी जाऊन-येऊन मिळून 45 दिवसांचा कालावधी आहे. दरम्यान पालखी प्रस्थान झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरी मुक्काम असून त्यानंतर सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Anjali Damania and Ajit Pawar: पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, अमित शाहांकडे जाण्याची तयारी
24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर... अंजली दमानियांनी अमित शाहांना मेल धाडला, म्हणाल्या...
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Embed widget