एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aaditya Thackeray : मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीत अमानुष लाठीचार्ज झाला होता. बदलापूरमध्येही आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. महाराष्ट्रात हा निर्दयीपणा सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

नाशिक : मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीत अमानुष लाठीचार्ज झाला होता. बदलापूरमध्ये (Badlapur) बालिका अत्याचाराचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर देखील लाठीचार्ज झाला. महाराष्ट्रात हा निर्दयीपणा सुरू आहे. लाठीहल्ल्याचा आदेश देणारा एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील खरा जनरल डायर कोण? हा जनरल डायर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, अशी टीका युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  

आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य खोके आणि मिंधे सरकार हटविण्याची वाट जनता बघत आहे. मात्र, मिंध्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महापालिकेच्या निवडणुका (Election) घेण्यात आलेल्या नाही. नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेच्या कामांचा बट्टाबोळ झाला आहे. 

महिलांसाठी शक्ती कायदा करणार

प्रशासकांच्या माध्यमातून शहरांची लूट सुरू आहे. मात्र, आपले सरकार आल्यानंतर भ्रष्ट अधिकारी आणि लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच आहोत. तसेच यांना आता लाडकी बहीण आठवली. मी सांगतो लाडकी बहीण आम्ही बंद करणार नाही तर त्यात वाढ करून राज्यातील महिलांसाठी शक्ती कायदा करणार, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही

ते पुढे म्हणाले की, मुंबई- गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई अहमदाबाद या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे. मिंधे या रस्ताने गुवाहाटीला पळाले असते तर त्यांनी रस्त्यांची दुर्दशा दिसली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. मिंधे सरकारचे कामात लक्ष नाही. खोके आणि कमीशन घेत राज्याची लूट करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. मिंध्यांना निवडणुकीची भाती वाटत असल्याने जनतेने भाजप आणि मिंध्यांना नाकारले आहे, त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना पराभव समोर दिसत असल्याने येणारा प्रत्येक दिवस आपला आणि आपल्या लाडक्या कंत्राटदारांचा या धोरणाने ते राज्याची लूट करत आहेत. 

आमचं सरकार आल्यावर बहि‍णींना वाढीव रकमेसह सुरक्षाही देणार

आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र, बहिणींना पैसे नको, सुरक्षा हवी आहे. महिलांवर अत्याचार करणारे मंत्री आहेत. सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणारे मंत्री आहेत. ते बहिणींना भाऊ वाटतात का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी महिलांना केला. आता पराभव समोर दिसत असल्याने पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात येईल, असे ते सांगत आहे. मात्र, भूलथापा न देता हिंमत असेल तर वाढीव रक्कम आताच द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. आमचेच सरकार येणार आहे, हे निश्चित आहे. त्यावेळी आम्ही बहिणींना वाढीव रक्कम तर देऊच, शिवाय सुरक्षाही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. 

बडगुजरांची ठाकरेंकडे 8 जागांची मागणी

दरम्यान, लोकसभेला शिवसैनिकांनी परिश्रम घेत गद्दाराला गाडत राजाभाऊ वाजे यांना बहुमताने विजयी केले. नाशिक लोकसभेसह जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद असून विधानसभेला पंधरापैकी आठ जागा मिळाव्या, अशी मागणी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आणखी वाचा 

Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Crime News: आईला वाचवायला गेला अन् चिमुकल्याचाही जीव गेला; नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण समोर
आईला वाचवायला गेला अन् चिमुकल्याचाही जीव गेला; नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget