एक्स्प्लोर

Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप

सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात. रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते.

नांदेड :  सध्या सर्वत्र मोहरम (Muharram)  सुरू आहे. या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे. काल भाविक चक्क इथे निखाऱ्यावरुन चालत होते. अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना इजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक इजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय. 

सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात. रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते. अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना इजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक इजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.दरम्यान 3 सेकंद निखाऱ्यावर पाय ठेवल्यास इजा होत नाही, त्यापेक्षा अधिक काळ पाय ठेवल्यास इजा होते, हे यामागचे शास्त्रीय कारण आहे.या घटनेत अनेक जण जखमी देखील होतात. पण कोणी समोर येत नाही.त्यामुळे अशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय.

श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म

धगधगते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगावर  अक्षरश:  काटा येतो. परंतु ही अग्नीपरीक्षा भाविकांकडून दिली जाते. मात्र धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते सांगतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे. श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतोय. पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जपताना अशा प्रथा, परंपरांकडे चिकित्सकपणे पहावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. 

दरम्यान, नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसचे  म्हटलं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणही अशा प्रथा पंरपरा जोपासताना दिसतात.  

हे ही वाचा :

Latur Muharram : एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण लातुरातील नांदगावात होतोय मोहरम  

                                

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
Eknath Shinde Shrikant Shinde: निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
Nanded News: निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली
निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली
Nanded BJP : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला अभ्यासवर्गात बोलावून ऐनवेळी डावललं; अर्ध्या रस्त्यातून घरी पाठवलं! गणपतराव राऊतांची पत्रातून तीव्र अपमान झाल्याची पत्रातून खंत
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला अभ्यासवर्गात बोलावून ऐनवेळी डावललं; अर्ध्या रस्त्यातून घरी पाठवलं! गणपतराव राऊतांची पत्रातून तीव्र अपमान झाल्याची पत्रातून खंत

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget