एक्स्प्लोर

 नांदेडच्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फडका, दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात 

Nanded News Update : परतीच्या पावसाने नुकसाना झाल्यामुळे यंदा नांदेडमधील शेतकऱ्याला दिवाळीचा सण देखील साजरा करता आला नाही. नांदेडमधील जवळपास दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेले आहे.

Nanded News Update : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि  नंतर परतीच्या पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांची (Farmer) दिवाळी अक्षरशः पाण्यात गेलीय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांडमधील जवळपास दीड लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पिक (Soybeans Crop) पाण्यात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने नुकसाना झाल्यामुळे यंदा शेतकऱ्याला दिवाळीचा सण देखील साजरा करता आला नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्याला दिवाळ सणाचे कपडे, गोडधोड तर दूरच पण आता खाण्या पिण्याचेही वांदे होऊन बसलेत. अतिवृष्टीचे अनुदान, पीक विम्यास बँकांचा खोडा आणि परतीच्या पावसाचा तडाखा अशा सर्वच बाजूंनी शेतकरी पिचला गेलाय. परतीच्या पावसाच्या तडाख्याने पिकांसह शेतकऱ्यांच्या संसाराची मात्र  धूळधाण  झालीय.  सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ आलीय.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. परंतु, यावर्षी 1350 ते 1400 मिलिमीटर पेक्षा पाऊस झालाय, जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटर पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी, नंतर अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्याने यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करू असे आश्वासन दिले होते. परंतु पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडी मदतरुपी सरकारची साखर  पडून तोंड गोड झालं नाही. पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टी मदत काही शेतकऱ्यांना मिळालीय, पण तीही अत्यल्प आहे. दरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना रब्बीची पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली असून. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात कोसळलीय. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केलीय. आता तरी पिक विमा, अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget