एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा, सोयाबीनसह, मूग, उडीद पिकं पाण्याखाली

नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान सततच्या होणाऱ्या जोरदार पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत.

Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान सततच्या होणाऱ्या जोरदार पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. तर सुरुवातीला अवकाळी, अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही सरकारनं मदत दिली नाही. हदगाव तालुक्यातील मनाठा, भाटेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. या परतीच्या धुव्वाधार पावसामुळं सोयाबीनसह,उडीद, मूग ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसानं नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. तर दिवाळीच्या तोंडावर जिल्हाभरात सोयाबीन काढणीला वेग आला असताना परतीच्या पावसाच्या जोराने सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर या पावसामुळं उरल्या-सुरल्या सोयाबीनची काढणीही करता येत नाही. त्यामुळं सोयाबीनच्या पिकात पाणी साचून सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यात आता काही दिवस पावसाचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोजच्या या पावसामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांच्याही आता नाकी नऊ आले आहेत. तर गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या पावसाच्या सततच्या पावसामुळं शेतात मात्र पाणीच पाणी झालं आहे.  दरम्यान अतिवृष्टी ,अवकाळी ,परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या बळीराजाने सरकारकडे मदतीची हाक दिली आहे.

वर्धा जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस पिकाला फटका

वर्धा (Wardha) जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. देवळी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं सोयाबीनसह (soybean) कापूस (cotton) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतात पाणी साचल्यानं बाकीची पिकं देखील खराब होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळं दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळं गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसानं पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळं नुकताच अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट 

आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आधीच पावसानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Embed widget