एक्स्प्लोर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीच्या पुलावरून कोसळली; भीषण अपघातात 5 ठार

Nanded Accident : तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असतांना दोघींचा मृत्यू झाला आहे.

Nanded Accident : नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहन चालकाचे गाडीवरील  नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी गाडी थेट हाळदा-मोघाळी गावाजवळ असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन नदीत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असतांना दोघींचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात 4 जण किरकोळ आणि 1 जण गंभीर जखमी झाला आहे. 

भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने परत जात असतांना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला. त्यामुळे रस्त्यावरील हाळदा-मोघाळी या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन ते वाहन नदीत कोसळले. रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धाऊन गेले. तसेच त्यांनी झालेल्या भिषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवली. मात्र, तोपर्यंत तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. 

अपघातात 5 जणांचा मृत्यू... 

ज्यात सविता श्याम भालेराव (30 वर्षे),प्रिती परमेश्वर भालेराव (8 वर्षे)दोघी ही रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड( 9 वर्षे)  (रा.रामखडक ता.उमरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, रेखाबाई परमेश्वर भालेराव (30वर्षे),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (वय 28 वर्षे),श्याम तुकाराम भालेराव (35 वर्षे) तिघे ही रा. रेणापूर ता. भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले. परंतू, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

जखमींवर उपचार सुरु...

तसेच, जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत.तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (9 वर्षे),प्रितेश परमेश्वर भालेराव (8 वर्षे),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (7 वर्षे), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव( 28 वर्षे) सर्वजण (रा.रेणापूर ता.भोकर) यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. 

मयत व जखमी एकाच कुटुंबातील

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत.सदरील दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणी नंतर मयत पाचही जणांवर रेणापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच पुढील तपास व कारवाई पो.नि.सुभाचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Buldhana Accident : पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; 18 प्रवासी जखमी, आठ जणांची प्रकृती गंभीर

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T Raja Singh: नितेश राणेंना माझं समर्थन, महाराष्ट्रातील सर्व मदरसे उद्ध्वस्त करा; टी. राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान
नितेश राणेंना माझं समर्थन, महाराष्ट्रातील सर्व मदरसे उद्ध्वस्त करा; टी. राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Nanded Crime News: धुरंधर 2 चित्रपट पाहून ई-स्क्वेअरमधून बाहेर आला अन्...; नांदेडच्या तिहेरी हत्याकांडाचा स्टार्ट टू एंड इतिहास, सदा देशमुख गँग VS अनिल पंजाबी टोळी, नेमकं वैर का?
धुरंधर 2 चित्रपट पाहून ई-स्क्वेअरमधून बाहेर आला अन्...; नांदेडच्या तिहेरी हत्याकांडाचा स्टार्ट टू एंड इतिहास, सदा देशमुख गँग VS अनिल पंजाबी टोळी, नेमकं वैर का?
Nanded Crime news: नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हादरवणारा घटनाक्रम समोर
नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हादरवणारा घटनाक्रम समोर

व्हिडीओ

Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget