एक्स्प्लोर

NMC Elections 2022 : मनपा निवडणूकीतील भाजपच्या प्रभाग पद्धीतवर राज ठाकरे यांची टीका

एका प्रभागात 4 नगरसेवक असले की, समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांनाही माझ्याकडे नाही त्याच्याकडे जा, अशी टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे ही पद्धतच बंद व्हावी अशी अपेक्षाही यावेळी ठाकरेंनी व्यक्त केली.

नागपूरः राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत तीन वार्डचा एक प्रभाग, चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची आहे. यामुळे नागरिकांना आपल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागतात. एकदा निवडूण आले की नगरसेवकही गब्बर बनतात. ही पद्धत बंदच केली पाहीजे, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणूकीतील प्रभाग पद्धतीवर केली. नागपुरातील रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे राज ठाकरे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे एक वार्ड एक प्रभाग पद्धतीनुसार निवडणूकात होतात. त्याचप्रमाणे राज्यातही व्हाव्या मात्र काही मोजक्या मोठ्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी ही प्रभाग पद्धत अमलांत आणण्यात आली आहे. एखाद्या परिसरात प्रभाव असलेला चांगला कार्यकर्ता या प्रभाग पद्धतीमुळे निवडणून येऊ शकत नाही. चार वार्डांच्या प्रभागात सामान्य उमेदवार हा टीकू शकत नाही. फक्त मोठे राजकीय पक्ष आणि धनाढ्या उमेदवारच टीकू शकतो असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

भाजप विरुद्ध लढणार

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. निवडणूकीत मोठं होण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध लढणे गरजेचे असते. प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या असतात. त्याचा अभ्यास करुनच त्याचे व्हिजन तयार करता येते. त्या व्हिजनवरुनच तुम्हाला जनता मतदान करीत असते. त्यामुळे आम्ही चांगले उमेदवार देऊ. नागपुरात आम्ही भाजपविरुद्ध लढू तसेच आमचे उमेदवार निवडूनही येतील असा दावा यावेळी राज ठाकरे यांनी केला.

प्रभाग पद्धत लोकशाहीसाठी घातक

प्रभाग पद्धतीमुळे एकीकडे फक्त मोठे पक्ष विजयी होतात आणि खरा समाजसेवक मागे राहून जातो. यासोबतच चार वार्डांचा प्रभाग असल्यास वेग-वेगळ्या पक्षाचे दोन-दोन उमेदवार निवडूण आले तर एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करतात. त्यामुळे प्रभागाचा विकास होत नसल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. एका प्रभागात चार नगरसेवक असले तर समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांनाही माझ्याकडे नाही त्याच्याकडे जा अशी टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे ही पद्धतच कायमची बंद व्हावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंनी मतदारांची प्रतारणा केली

लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती, पण तुम्ही युती-आघाड्या करुन निवडणूका लढवता, लोकं तासनतास रांगेत राहून मतदान करतात. लोकासमोर एक गोष्ट सांगता, तुमचं ऐकून लोक तुम्हाला मतदान करत असता. पण निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळचा शपथविधी करतो. लोकांनी या सगळ्यांचा हा खेळ बघत राहायचे का. त्या मतांचा हा अपमान आहे. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. आज नागपूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. 1989 सालची गोष्ट असेल, शिवसेना-भाजप युतीच्या सुरवातीला, मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन होतो असे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भाजपचे प्रमुख नेते यांनी ठरवलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Custody : संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली

राज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Bunty Bhangdiya: 'काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांची गद्दारी', विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप; बंटी भांगडियांचा पलटवर, म्हणाले, पुरावेही द्या
'काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांची गद्दारी', विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप; बंटी भांगडियांचा पलटवर, म्हणाले, पुरावेही द्या
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget