एक्स्प्लोर

Vidarbha Flood : नुकसान भरपाईच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळणार, नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी

अधिसूचनेनुसार प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे विमा क्षेत्र घटकातील पिकांकरीता तरतूद असून नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामूळे पीक पेरणी 25 टक्केपेक्षा जास्त बाधित झाली असल्यास रक्कम मिळणार आहे.

नागपूर : प्रधानमंत्री  पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत  प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखीमीच्या बाबीअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना जारी केली आहे. 1 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम  देण्याची तरतूद आहे.

अधिसूचनेत प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसूचित पिकांकरीता तरतूद असून पर्जन्यमानातील असाधारण कमी व जास्त प्रमाण असेल तर इतर नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामूळे पीक पेरणी 25 टक्केपेक्षा जास्त बाधित झाली असल्यास रक्कम मिळणार आहे.

पीकांचे उत्पादन 50 टक्के कमी

नागपूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली असून या कालावधीत जिल्ह्यात एकूण सरासरीपेक्षा 46.4 टक्के पावसाची जास्त नोंद आहे. जिल्ह्यातील 70 महसूल मंडळात जास्त पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टी झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत सुयुक्त सर्वेक्षण करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठविण्यात आला असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ  व पीक विमा कंपनी यांनी जिल्ह्यातील सोयाबीन, तूर व कापूस पिकांचे उत्पादन 50 टक्केपेक्षा कमी येणार असल्याचे नमूद केले आहे. राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी यांच्या संयुक्त पाहणीनूसार नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, अशी तरतूद असल्याने त्यानुसार मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीद्वरे पीक नुकसानीची यादुच्छिक पध्दतीने सर्वेक्षण व संयुक्त पाहणी करण्यात आली त्यानुसार अधिसूचित महसूल मंडळात बाधीत पिकांचे येणारे उत्पादनानुसार त्या पिकाच्या मागील 7 वर्षाच्या सरासरी 50 टक्केपेक्षा कमी असल्यामुळे नुकसान भरपाईस पात्र आहेत.

25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे नमूद

अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन, तूर व कापूस या पिकासाठी, पीक विमा योजनेच्या तरतूदीच्या अधिन राहून संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी , मानिकचंद आयकॉन 3 रामाळा, बंडगार्डन, पुणे यांनी आदेशित करण्यात आले आहे. या आदेशानुसार विमा कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून 1 महिन्याच्या आत तरतूदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन, तूर व कापूस या पिकांकरीता जिल्हयातील अधिसूचित महसूल मंडळातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या  25 टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी, असे नमूद आहे. जोखीमेंतर्गत बाधित अधिसूचित क्षेत्रातील सोयाबीन, तूर व कापूस पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर अधिसूचित विमा क्षेत्रातील पिकाच्या विमाधारक शेतकरी हे पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील, असे अधिसूचनेत नमूद आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

High Court : ट्रस्टकडे हत्तीच्या देखभालीची जबाबदारी; वास्तविकता पुढे आणा, न्यायालयाचे निदेंश

नागपूरचे उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी ठरत आहे मृत्यूचा सापळा? दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget