एक्स्प्लोर

विदर्भात कापूस खरेदी धीम्या गतीने सुरु असल्याने शेतकरी अडचणीत, नागपुरात भाजपचं आंदोलन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. जून महिना अर्धा संपला तरी 65 टक्के शेतकऱ्यांच्या घरातला कापूस खरेदी करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

नागपूर : विदर्भात यावर्षी कापूस खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. विदर्भात मान्सून दाखल झाला असतानाही शेतकऱ्यांच्या घरात गेल्या हंगामाचा कापूस अजूनही पडून असल्याने यावर्षी बियाणे खरेदीपासून इतर सर्व खर्चांसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरणं सुरु केलं आहे. आज नागपुरात भाजपच्या ग्रामीण भागातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन कापूस खरेदी संदर्भात शासनाच्या प्रयत्नांचा निषेध केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांनी त्यांच्या हातात पऱ्हाटी (कापसाच्या फांद्या), कापसाची माळ तसेच बियाणांचे पाकीट घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले.

विदर्भ आणि मराठवाड्यात लाखो शेतकरी खरीप हंगामात कापसाचं पीक घेतात. मात्र पुढील हंगाम सुरु होण्याच्या आधीच पणन महासंघ आणि सीसीआयकडून त्याची खरेदी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात दिरंगाई झाली आहे. महासंघाकडून शेतकऱ्यांना टोकन नंबर मिळाल्यानंतरही खरेदी केंद्रावर अनेक दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होत नाही. आता तर पावसाळा सुरु झाला असून यंदाचा खरीप हंगामही तोंडावर आला आहे. असं असताना मागील हंगामाचा कापूस विकला न गेल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. आज याच मुद्द्याला हाताशी धरत भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केलं.

विदर्भात कापूस खरेदी धीम्या गतीने सुरु असल्याने शेतकरी अडचणीत, नागपुरात भाजपचं आंदोलन

सरकार अत्यंत धीम्या गतीने कापूस खरेदी करत असून जून महिना अर्धा संपला तरी 65 टक्के शेतकऱ्यांच्या घरातला कापूस खरेदी करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जाणूनबुजून शेतकऱ्यांचा कापूस हळुवार खरेदी केला जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. या मागे मोठा घोटाळा असून राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 2 हजार रुपये एवढे भावांतर म्हणजेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत बावनकुळे यांनी आज नागपूरच्या संविधान चौकावर प्रतिकातमक आंदोलन केले. पणन महासंघाने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याने बहुतांशी शेतकऱ्यांच्या घरात कापूस पिवळा पडला आहे किंवा त्याचा दर्जा घसरला आहे. शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर केले जात असून यामागे मोठा घोटाळा झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात सरकारच्या उदासीनतेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील हजरो शेतकरी कुटुंब हवालदिल झाल्याचे बावनकुळे म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे आणि खते देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे सरकारने बांधावर बियाणे आणि खते देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी ही करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आणि गरीब कुटुंबांचा 300 युनिटपर्यंतचं वीज बिलही माफ करावं आणि त्यासाठी राज्य सरकारने नुसत्या घोषणा न करता आर्थिक तरतूदही करावी, अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget