एक्स्प्लोर

अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल : चंद्रशेखर बावनकुळे

मग ते 2014च्या निवडणूकीचा निकाल असो किंवा 2019च्या निवडणूकीचा, उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होतीच, असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.

Nagpur News : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असतानाच शिवसेनेकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी (Congress) सोबत आघाडीसाठी प्रस्ताव असल्याचा गौप्यस्फोट कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यामध्ये भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणे सुरु केले आहे. "अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल. उद्धव ठाकरेंनीच तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील," असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, "राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजीचा तो निर्णय उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) असेल."

पुढे बावनकुळे म्हणाले, "ज्या काळाबाबात अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे पदच नव्हते, त्यामुळे ते भाजपसोबत दगाबाजीचा विचारही करु शकत नाहीत." "मग ते 2014 च्या निवडणुकीचा निकाल असो किंवा 2019 च्या निवडणुकीचा, उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होतीच," असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत खैरे फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्यासाठी असं बोलत आहेत." ते त्यांच्या नजरेत येऊ इच्छितात, असे बोलून बावनकुळे यांनी खैरेंच्या विधानाची खिल्ली उडवली.

पवारांचा काळ गेलाय : बावनकुळे

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आता राज्यातील स्थिती बदलली आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांचा काळ गेला आहे. सुप्रिया सुळे म्हणतात पवार साहेब बाहेर पडले तर निश्चितच सरकार येते. मात्र, आता तो काळ गेला असून बारामती लोकसभा मतदारसंघात फक्त एक बारामती विधानसभा क्षेत्र सोडलं, तर इतर पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हानात्मक परिस्थिती आहे. आता एकविसावा शतक आहे. पवारांचा काळ संपला आहे, हा मोदींचा काळ आहे."

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

2014 मध्ये राज्यात असलेल्या फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे हे देखील होते, असंही अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांनी म्हटलं. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडीला आता विरोध करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशोक चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) दावा करत म्हटलं आहे की, "एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते."

इतर महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंसंदर्भात अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा, भाजपा म्हणतेय, चव्हाणांची क्लिपच जाहीर केली तर...

अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidarbha Heat Wave : उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे हालेहाल! पुढील दोन दिवस सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट, पारा 47 अंश सेल्सिअस पार? 'या' जिल्ह्यात दहा वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद
उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे हालेहाल! पुढील दोन दिवस सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट, पारा 47 अंश सेल्सिअस पार? हवामान खात्याचा धोक्याचा इशारा
Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
Heat Wave: तापमानाचा भडका! विदर्भासह उत्तर महराष्ट्रात उष्णतेनं अंगाची लाहीलाही! सूर्य अजून आग ओकणार, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
तापमानाचा भडका! विदर्भासह उत्तर महराष्ट्रात उष्णतेनं अंगाची लाहीलाही! सूर्य अजून आग ओकणार, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Heat Wave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत, नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, तर लातूरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत, नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, तर लातूरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
Embed widget