एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत नागपुरच्या अभियंत्याचं मोठं योगदान; अनुभवातून केली अडीअडचणींवर मात

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्मितीमध्ये मराठमोळ्या आणि मूळच्या नागपूरकर असलेल्या वास्तू विशारद अविनाश संगमनेरकर यांचे देखील मौलिक योगदान आहे.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) प्रभूश्री राम मंदिरात नुकतीच प्राणप्रतिष्ठा झाली. हा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळा अवघा भारत अनुभवत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे. अनेकांच्या त्याग, परिश्रम आणि योगदानातून हे स्वप्नवत राम मंदिर अस्तित्वात आले आहे. अशातच या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये मराठमोळ्या आणि मूळच्या नागपूरकर असलेल्या वास्तू विशारद अविनाश संगमनेरकर यांचे देखील मौलिक योगदान आहे. तीन वर्षांपासून त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत अयोध्येत राहून राम मंदिर निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे. 

नागपुरातील एका अभियंत्यांचे मौलिक योगदान

तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा आज पूर्ण झाली आहे. या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आपल्या योगदानाची समिधा अर्पण करण्याची संधी नागपूरचे वास्तू विशारद अविनाश संगमनेरकर यांना मिळाली. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे त्यांना 2020 साली पाचारण करण्यात आले होते.

तीन वर्षांपासून त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत अयोध्येत राहूनच मंदिर निर्मितीचे कार्य केले. अविनाश संगमनेरकर यांच्यावर त्यावेळी विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्याचीच जवाबदारी देण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा पन्नासहून अधिक अभियंते, तंत्रज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक आणि इतर साडेचार हजारांच्या जवळपास कामगार सहभागी झाले होते.

बहुतांश काळ अयोध्येतच

ट्रस्टच्या माध्यमातून खासगी कंपन्यांनादेखील कामाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, देखरेखीसाठी संगमनेरकर यांच्यासह पाच प्रमुख अभियंत्यांवर जबाबदारी होती. मंदिर निर्मितीत सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल आणि  इलेक्ट्रिकल अभियंत्यांचे काम फार मोठे होते. कामाचे महत्त्व लक्षात घेता संगमनेरकर हे साडेतीन वर्षांतील बहुतांश काळ अयोध्येतच राहिले. आज देशाच्या सन्मानाचे प्रतीक ठरणाऱ्या या मंदिराच्या निर्मितीत योगायोगाने का होईना मात्र नागपुरातील एका अभियंत्यांचे मौलिक योगदान लाभले आहे. 

कृष्णशिलेत साकारलंय श्रीरामाचं तेजस्वी रुप 

अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेली प्रभू श्रीरामाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. शालिग्राम खडक म्हणजेच, कृष्णशिला. हा काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचं रूप मानलं गेलं आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले जातात. शालिग्राम खडक हजारो वर्ष जुना आहे. हा खडक पाणी प्रतिरोधक आहे. चंदन आणि रोळी लावल्यानं मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.   

हेही वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget