एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याची धारणा; प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? याचं महत्त्व काय?

Ram Lala Pran Pratishtha: अयोध्येत वैदिक मंत्रोच्चारात रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती देखील पार पडली, परंतु मूर्तीच्या स्थापनेआधी प्राणप्रतिष्ठा विधा का महत्त्वाचा असतो हे माहितीये का? तर जाणून घ्या

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे आणि यासोबतच अनेक वर्षांची प्रतीक्षा देखील संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला. वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (22 जानेवारी) पार पडली. अयोध्येतील या खास प्रसंगात पंतप्रधान मोदींसह देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणेही सहभागी झाले होते. अयोध्येत 16 जानेवारीपासून रामललाच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम सुरू होता. 

रामललाच्या अभिषेकानंतर त्यांचा फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये रामललाचे (Ram) रुप अतिशय दिव्य दिसत आहे. आता प्राणप्रतिष्ठा हा शब्द तर आपण सर्वांनी ऐकलाच असेल. मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करण्याची ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय, हे तुम्हाला माहीत आहे का? तर मग मंदिरात देवाची स्थापना करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा का केली जाते? जाणून घेऊया.

प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय?

त्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव किंवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते, यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.

प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची?

प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे? हे जाणून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. प्राण या शब्दाचा अर्थ जीवन शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. अशाप्रकारे प्राणप्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ जीवन शक्तिची स्थापना करणे असा होतो. प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवीच्या मूर्तीची पूजा करणं आवश्यक आहे. असं मानलं जातं की, प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवतेच्या स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होते.

मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची प्रक्रिया काय?

विधीच्या सुरुवातीला मूर्तीला सन्मानाने आणलं जातं. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखं तिचं स्वागत केलं जातं. मग त्यावर सुवासिक वस्तूंचा लेप लावला जातो, मूर्तीला दुधाने आंघोळ घातली जाते, मग मूर्ती स्वच्छ केली जाते आणि अभिषेक करण्यायोग्य बनवली जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते. पूजेदरम्यान मूर्तीचं तोंड पूर्वेकडे असतं. मूर्ती योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते.

पूजा केल्यानंतर सर्व प्रथम मूर्तीवर बांधलेली पट्टी काढून डोळे उघडतात, त्यानंतर डोळ्यात मध टाकले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य जिवंतपणाची अनुभूती येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ram Mandir : देशातील सर्वात मोठी 10 राम मंदिरं माहितीये? 'या' राम मंदिरात भगवान कृष्ण करायचे रामलल्लाची पूजा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

April 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! एप्रिल महिना कसा जाणार? भाग्याचा कि टेन्शनचा? मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! एप्रिल महिना कसा जाणार? भाग्याचा कि टेन्शनचा? मासिक राशीभविष्य
Vastu Tips : 'या' 3 वस्तूंमुळे घरात येते कंगाली; कायमचा लागतो वास्तूदोष, आजच घराबाहेर काढून टाका
'या' 3 वस्तूंमुळे घरात येते कंगाली; कायमचा लागतो वास्तूदोष, आजच घराबाहेर काढून टाका
Leo Monthly Horoscope April 2026: सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती लय भारी! एप्रिल महिना नोकरदारांसाठी उत्तम, नव्या संधी मिळतील, मासिक राशीभविष्य
सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती लय भारी! एप्रिल महिना नोकरदारांसाठी उत्तम, नव्या संधी मिळतील, मासिक राशीभविष्य
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच सूर्याचा रेवती नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडण्याचा काऊंटडाऊन सुरु
अवघ्या काही तासांतच सूर्याचा रेवती नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडण्याचा काऊंटडाऊन सुरु

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Embed widget