एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याची धारणा; प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? याचं महत्त्व काय?

Ram Lala Pran Pratishtha: अयोध्येत वैदिक मंत्रोच्चारात रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती देखील पार पडली, परंतु मूर्तीच्या स्थापनेआधी प्राणप्रतिष्ठा विधा का महत्त्वाचा असतो हे माहितीये का? तर जाणून घ्या

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे आणि यासोबतच अनेक वर्षांची प्रतीक्षा देखील संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला. वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (22 जानेवारी) पार पडली. अयोध्येतील या खास प्रसंगात पंतप्रधान मोदींसह देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणेही सहभागी झाले होते. अयोध्येत 16 जानेवारीपासून रामललाच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम सुरू होता. 

रामललाच्या अभिषेकानंतर त्यांचा फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये रामललाचे (Ram) रुप अतिशय दिव्य दिसत आहे. आता प्राणप्रतिष्ठा हा शब्द तर आपण सर्वांनी ऐकलाच असेल. मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करण्याची ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय, हे तुम्हाला माहीत आहे का? तर मग मंदिरात देवाची स्थापना करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा का केली जाते? जाणून घेऊया.

प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय?

त्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव किंवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते, यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.

प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची?

प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे? हे जाणून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. प्राण या शब्दाचा अर्थ जीवन शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. अशाप्रकारे प्राणप्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ जीवन शक्तिची स्थापना करणे असा होतो. प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवीच्या मूर्तीची पूजा करणं आवश्यक आहे. असं मानलं जातं की, प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवतेच्या स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होते.

मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची प्रक्रिया काय?

विधीच्या सुरुवातीला मूर्तीला सन्मानाने आणलं जातं. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखं तिचं स्वागत केलं जातं. मग त्यावर सुवासिक वस्तूंचा लेप लावला जातो, मूर्तीला दुधाने आंघोळ घातली जाते, मग मूर्ती स्वच्छ केली जाते आणि अभिषेक करण्यायोग्य बनवली जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते. पूजेदरम्यान मूर्तीचं तोंड पूर्वेकडे असतं. मूर्ती योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते.

पूजा केल्यानंतर सर्व प्रथम मूर्तीवर बांधलेली पट्टी काढून डोळे उघडतात, त्यानंतर डोळ्यात मध टाकले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य जिवंतपणाची अनुभूती येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ram Mandir : देशातील सर्वात मोठी 10 राम मंदिरं माहितीये? 'या' राम मंदिरात भगवान कृष्ण करायचे रामलल्लाची पूजा

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget