एक्स्प्लोर

Worli hit and run: कावेरी नाखवांना गाडीखाली चिरडणारा मिहीर शहा पळून का गेला, कधी सापडणार? रोहित पवारांनी सांगितली धक्कादायक थिअरी

Mumbai Crime news: वरळीत मिहीर शहा याने आपल्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा यांना चिरडले होते. मिहीरने त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. यामध्ये कावेरी नाखवांचा मृत्यू झाला होता. मिहीर शहा शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलगा

मुंबई: वरळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणारा आरोप मिहीर शहा हा अद्याप फरार आहे. मिहीरचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी असून त्यांनीच अपघातानंतर मिहीरला (Mihir Shah) पळून जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. मात्र, या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक थिअरी मांडली आहे. मिहीर शहा हा वरळी अपघातानंतर (Worli Accident) घटनास्थळावरुन पळून जाण्यामागे एक कारण आहे आणि तो येत्या काही तासांत पोलिसांना सापडेल. हा व्यवस्थित रचलेला एक प्लॅन आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की, अपघात झाल्यानंतर एखादी व्यक्ती घटनास्थळावरुन का पळून जाते? त्याने मद्यप्राशन किंवा ड्रग्जचे सेवन केले असेल तर त्याचा अंश 48 किंवा 70 तासांच्या कालावधीत रक्तामधून निघून जातो. त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा पुढील 15 ते 20 तासांमध्ये पोलिसांच्या हाती लागेल. मग पोलीस त्याची तपासणी करतील, तेव्हा कळेल की, त्याने दारु किंवा ड्रग्जचे सेवन केले नव्हते. उलट तीच महिला गाडीच्या मध्ये आली आणि अपघात झाला, असा सेटअप रचला जाईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. हे सरकार पॉवरफुल लोकांसाठी आहे. राजेश शहा यांच्याकडे पैसा आहे, ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाची चूक निघणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

राज्यातील यंत्रणा श्रीमंत आणि ताकदवान लोकांसाठी काम करते: रोहित पवार

महाराष्ट्रात 2014 नंतर जी सिस्टीम तयार झाली आहे, ती यंत्रणा श्रीमंत व्यक्ती, राजकीय नेते आणि ताकदवान नेत्यांना मदत करणारी आहे.  ही यंत्रणा गरिबांना मदत करणारी नाही. वडील हे मुलाला मदत करणारच, पण वरळी हिट अँड रन प्रकरणात सरकारने ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या लोकांना मदत केली पाहिजे. राज्य सरकारने आता सरकारी योजनांची जाहिरात करण्यासाठी 5500 कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'

लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
INFOCOM Mumbai : 'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget