एक्स्प्लोर

Police Recruitment: पोलीस भरती कधी निघणार, फेसबुक लाईव्हवर तरुणांचा मुंबई पोलीस आयुक्तांना सवाल

मुंबईचे (Mumbai) नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) हे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. आज रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधला आहे.

Police Recruitment: मुंबईचे (Mumbai) नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) हे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. आज रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी मुंबईतील ट्राफिक समस्या, पास्टपोर्ट मिळण्यास येणाऱ्या अडचणी या मुद्द्यांवर बोलतानाच इतर अनेक मुद्द्यांवर आपली मत मांडली आहेत. पोलीस आयुक्त लाईव्ह असतानाच मुंबईतील अनेक तरुणांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कमेंट्समध्ये संजय पांडे यांना आपल्या समस्या सांगितल्या आहेत. याच कमेंटमधील काही म्हत्वाचे प्रश्न आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.             

पोलीस भरती कधी निघणार, तरुणांचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

महाराष्ट्रात अनेक असे तरुण आहेत, जे गेले अनेक वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच अनेक तरुणांनी कमेंट्समध्ये महाराष्ट्रात पोलीस भरती कधी सुरू होणार, असा प्रश्न त्यांना विचारला आहे. तरुणाच्या या प्रश्नाला संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये उत्तर दिले नाही. असं असलं तरी पोलीस भरती जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारला असतो. याचा पोलीस आयुक्तांशी काही संबंध नसतो.  

किरकोळ रजा वाढवावी, पोलीस कर्मचाऱ्यांनी मांडल्या समस्या

संजय पांडे यांचे फेसबुक लाईव्ह सुरू असताना कमेंट्समध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात पोलीस कर्मचारी गोरखनाथ धोबड, मनीष अस्वले आणि इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या समस्या मांडत किरकोळ रजा वाढवण्याची विनंती केली आहे. याबाबत कमेंट करताना किरण आव्हाड म्हणाले आहेत, ''सर महिलांसाठी 8 ड्युटी केल्याचा निर्णय अतिशय छान आहे. त्याच धर्तीवर 12 तास ड्युटीवर 24 तास ऑफचा निर्णय घेऊन पुरुष वर्गलाही न्याय द्यावा. आमच्या वरही जबाबदाऱ्या असतात. आम्हाला ही कुटुंबाला वेळ द्यायचा असतो.'' तर आणखी एका कमेंटमध्ये किरण आव्हाड म्हणाले आहेत की, किरकोळ रजा 12 दिवसावरून 20 दिवस व्हावी, वर्षभर 12 दिवस किरकोळ रजा पुरत नाही, म्हणून किरकोळ रजा वाढवावी अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केली आहे.

दरम्यान, या फेसबुक लाईव्हमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आवाहन करत संजय पांडे म्हणाले आहेत की, तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही कधी त्या माझ्या समोर मांडू शकता. मात्र त्याआधी याची कल्पना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत.  

संबंधित बातम्या: 

    

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget