एक्स्प्लोर

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवेश कधी? रेल्वेला आजही राज्य सरकारकडून बैठकीसाठी बोलावणे नाही

आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 2773 लोकल धावताहेत. त्यामुळे राज्य सरकारने अचानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवेश द्यायचे आदेश दिल्यास रेल्वे तयार आहे अशी भूमिका रेल्वेकडून घेण्यात आली आहे.

मुंबई : राज्य आणि रेल्वेमधील विसंवाद दिवसेंदिवस ताणला जात असल्याचे बघायला मिळते आहे. रेल्वेने राज्य सरकारकडे एका संयुक्त बैठकीची मागणी केली होती. जी बैठक आज होणे अपेक्षित होते मात्र आज देखील राज्य सरकारकडून कोणतेही बोलवणे न आल्याने रेल्वे राज्य सरकारच्या प्रतीक्षेत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या दोन्ही प्रशासनाच्या भांडणात प्रवाशांचे मात्र हाल होणे सुरूच आहे. राज्य सरकारच्या नाराजीनंतर रेल्वेने आपल्या संपूर्ण क्षमतेच्या 88 टक्के लोकल सेवा आजपासून सुरु केल्या आहेत, आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्णयाची आहे.

राज्य सरकारने 28 तारखेला रेल्वेला एक प्रस्ताव पाठवून त्यावर रेल्वेचा अभिप्राय मागितला होता. या प्रस्तावात प्रवाशांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी करून त्यांना वेळ मर्यादा देण्यात आली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने देखील 29 तारखेला आपला अभिप्राय राज्य सरकारला पाठवला होता. त्यामध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी यंत्रणा विकसित करावी, प्रत्येक तासाला महिला विशेष लोकल चालवणे व्यवहार्य नाही असे पत्राद्वारे कळवले होते. यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका संयुक्त बैठकीची मागणी रेल्वेने केली होती. मात्र 29 तारखेपासून आजतागायत राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा बैठकीसाठी बोलावणे आले नाही. त्यामुळे आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान रेल्वेच्या अभिप्रायावर राज्य सरकार नाखुश असल्याचे काही मंत्र्यांनी थेट सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारला शह देण्यासाठी रेल्वेने दोन दिवसात मोठ्याप्रमाणात लोकलच्या फेऱ्या वाढवल्या. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण क्षमतेच्या 88 टक्के लोकलच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 2773 लोकल धावताहेत. त्यामुळे राज्य सरकारने अचानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवेश द्यायचे आदेश दिल्यास रेल्वे तयार आहे अशी भूमिका रेल्वेकडून घेण्यात आली आहे.
गर्दी नियंत्रणासाठी एक बैठक व्हावी अशी मागणी रेल्वेने केली होती ज्याला राज्य सरकारने अजूनही उत्तर दिले नाही. गेल्या काही दिवसात जर ही बैठक झाली असती तर आतापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी मिळाली असती. मात्र राज्य सरकार आणि रेल्वेच्या या विसंवादामुळे अजूनही सर्वसामान्य प्रवाशांना हाल-अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे.
Mumbai Local मधील गर्दी टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा, सरकारच्या प्रस्तावाला रेल्वेचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget