एक्स्प्लोर

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत बुधवारी भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

आयएससीई बोर्डाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 226 शाळा त्यांच्याशी संलग्न असून एकूण 23 हजार 347 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. मागील सुनावणी दरम्यान आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रत्यक्ष परीक्षेत बसणे किंवा यंदाच्या पूर्व परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण स्वीकारणे, असे दोन पर्याय बोर्डाने सुचवले होते.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी आयसीएसई बोर्डाच्या लांबलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेणं अथवा अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबतच्या मुद्यावर राज्य सरकारच्या गोंधळलेल्या भूमिकेवरून मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी त्यांना चांगलेच फटकारले. एकीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असताना प्रलंबित परीक्षांबाबत द्विधा आणि संदिग्ध भुमिका का? असा सवाल करत यावर बुधवारी आपली स्पष्ट भुमिका मांडण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले.

आयएससीई बोर्डाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 226 शाळा त्यांच्याशी संलग्न असून एकूण 23 हजार 347 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. मागील सुनावणी दरम्यान आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रत्यक्ष परीक्षेत बसणे किंवा यंदाच्या पूर्व परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण स्वीकारणे, असे दोन पर्याय बोर्डाने सुचवले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालांत पूर्व परीक्षेतील गुणांचे तपशीलही बोर्डाने संलग्न शाळांकडून मागवले होते. ते कोर्टात सादर करण्यासाठी सोमवारी आयसीएसई बोर्डाने आणखी वेळ वाढवून मागितला. तो ग्राह्य धरत खंडपीठाने सरकारची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आयसीएसई शाळांमधील 50 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देऊ इच्छित असतील आणि त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी जास्त असल्यास सरकारची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला. तसेच या परीक्षांबाबत सरकार 'वेट अँड वॉच' भूमिकेचा अवलंब करु शकत नाही, असं बजावत त्यांना या विषयावर आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली : शिक्षणमंत्री उदय सामंत

कोरोनाचा मुंबईसह राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता मार्चमध्ये होणाऱ्या आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र रद्द झालेल्या या परीक्षा आता 2 ते 12 जुलै दरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएसई बोर्डाने घेतला आहे. मात्र, राज्यातील कोविड 19 रुग्णांची वाढती संख्या पाहता या परीक्षा रद्द करण्यात याव्यात तसेच विद्यार्थ्यांना ग्रेडेशन पद्धतीने किंवा मागील परीक्षांच्या सरासरी गुणांच्या आधारे गुण देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. रविंद्र तिवारी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली.

MHT CET कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली-शिक्षणमंत्री उदय सामंत

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget