![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली विधानपरिषदेची जागा कुणाकडे? 'या' नावाची चर्चा
Uddhav Thackeray MLA Seat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ज्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Maharashtra) जागेचा राजीनामा दिला त्यावरून भविष्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
![उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली विधानपरिषदेची जागा कुणाकडे? 'या' नावाची चर्चा Uddhav Thackeray MLA Seat Vidhan Parishad Maharashtra VidhiMandal Shivsena Eknath Shinde updates उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली विधानपरिषदेची जागा कुणाकडे? 'या' नावाची चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/59d414cfa86144c6bae95c7c03b8395c1658750645_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray MLA Seat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ज्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Maharashtra) जागेचा राजीनामा दिला त्यावरून भविष्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात देखील त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानपरिषद सभासत्वाचा देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसोबत आणखीन एक जागा रिकामी आहे. ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जर ती जागा भाजपकडे गेली तर जास्त काही वाद होतील असे वाटत नाही. मात्र शिंदे गटाकडे आली तर मात्र होऊ शकतात.
रामदास कदमांच्या नावांची चर्चा
शिंदे गटाकडे आलेल्या त्या एका विधान परिषदेच्या जागेवर अनेक निष्ठावंताचा डोळा आहे. सध्या ज्या शिवसेना नेत्यांना एकनाथ शिंदे भेटत आहेत त्यापैकी काही जण तर आहेतच पण जे ज्यांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला त्यांची देखील इच्छा या जागेसाठी असू शकते. यातच एक नाव म्हणजे रामदास कदम. सध्या रामदास कदम यांचा मुलगा शिंदे गटात आहे मात्र त्यानंतर अचानक रामदास कदम सर्वांसमोर आले.
एकनाथ शिंदे देखील तीच चूक पुन्हा करणार का?
जर विधान परिषदेच्या त्या जागेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावान नेत्याला मंत्रीपद दिले तर पुन्हा वाद होणार. कारण मागील युती सरकारमध्ये देखील चार विधान परिषदेच्या आमदारांनाच महत्त्वाचे मंत्रिपद दिल्याने शिवसेनेमध्ये मोठा वाद उफाळून आला होता. सुभाष देसाई, डॉ दीपक सावंत, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपद दिल्याने विधानसभेतील आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळेच एकनाथ शिंदे देखील तीच चूक पुन्हा करणार का असा प्रश्न इथे निर्माण होत आहे. राज्यात मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्ताराची अग्निपरीक्षा पार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेच्या या अग्निदिव्यातून देखील जावे लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर, दौऱ्यात कोणते मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)