एक्स्प्लोर
Advertisement
Matoshree | 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसापासून येथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्रीवरील ठेल्यावर चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तेथे मातोश्रीवर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच मातोश्रीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते.
आता मातोश्रीबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोना मुख्यमंत्र्यांच्या दारावर गेल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान
पोलिसांना 50 लाखांचं कवच
राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, तीन पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
Advertisement