एक्स्प्लोर
'मेट्रो 3’च्या भुयारीकरणाचा पारसी अग्यारींना धोका नाही!
मेट्रो-3 या भूमिगत मार्गिकेसाठी दक्षिण मुंबईत आझाद मैदानाजवळ प्रस्तावित असलेल्या दोन बोगद्यांना याचिकाकर्त्यांनी तीव्र विरोध करत या बोगद्यांचं काम थांबवण्याची विनंती केलीय.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मेट्रो-3 च्या खोदकामामुळे दक्षिण मुंबईतील पारसी अग्यारींना धोका नसल्याचा अहवाल व्हीजेटीआयनं सोमवारी हायकोर्टात सादर केला. मात्र या अहवालावर काहीशी नाराजी व्यक्त करत पारसी धर्मगुरूंनी हायकोर्टाकडून यासंदर्भात उत्तर देण्यासाठी वेळ मागण्यात आलीय. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं 'व्हीजेटीआय'ला संबंधित जागेची पाहाणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसंच हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्या इमारतींना मेट्रो-3 च्या कामामुळे होणाऱ्या नुकसानाचं काय? असा सवाल उपस्थित केला होता. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर पारसी धर्मगुरुंनी यासंदर्भात याचिका दाखल केलीय. मेट्रो-3 या भूमिगत मार्गिकेसाठी दक्षिण मुंबईत आझाद मैदानाजवळ प्रस्तावित असलेल्या दोन बोगद्यांना याचिकाकर्त्यांनी तीव्र विरोध करत या बोगद्यांचं काम थांबवण्याची विनंती केलीय. हे दोन्ही बोगदे पारसी प्रार्थनास्थळांच्या अगदी खालून जात असल्यानं हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्या या इमारतींना धोका निर्माण झालाय. तसेच या खोदकामामुळे प्रार्थनास्थळातील अग्नीचं पावित्र्यही लोप पावेल असा दावा या याचिकेत करण्यात आलाय. कुलाबा ते सिप्झ मेट्रो-3 चे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्याकरता दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे मेट्रोच्या भूयारीकरणासाठी ड्रिलिंग व खोदकाम करण्यात येत आहे. या कामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी इथं पारसींचे धार्मिक स्थळ असलेल्या अग्यारींच्या भिंतीला तडे गेले आहेत. या कामामुळे भूगर्भातील पाण्याचा प्रवाह बदलून येथील पवित्र विहीरीही कोरड्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो-3 ची मार्गिका बदलावी याकरीता काही पारसीं धर्मगुरूंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेट्रोचे प्रस्तावित काळबादेवी हे स्थानक अग्यारी पासून 5 मीटर अंतरावर असून या कामाकरिता स्फोटके वापरण्यात येणार आहेत असा युक्तिवाद याचिकार्त्यांच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी मेट्रो प्रशासनानं आपली बाजू मांडताना सांगितलंय की, अग्यारीच्या वरांड्याखालून भूयाराचे काम होणार आहे. अग्यारीच्या मूळ वास्तूला तसेच तेथील विहीरींना यामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























