एक्स्प्लोर
मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू
मुंबई आणि ठाणे परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहून किंवा तत्सम अपघातांमध्ये सहा जणांचा बळी गेला आहे.

मुंबई : मुंबईत झालेला मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन बालकांचा समावेश असल्याची माहिती 'रॉयटर्स'ने दिली आहे. विक्रोळीमध्ये घर कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 45 वर्षीय महिला आणि दीड वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. तर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ठाण्यामध्ये तीन जण पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स
दहिसर परिसरात प्रतीक घाटले हा तरुण वाहून गेला. गौरेशला वाचवण्यात यश आलं, मात्र प्रतीक अद्यापही बेपत्ता आहे. कांदिवलीच्या समतानगरमध्ये महिंद्रा कंपनीजवळच्या नाल्यात ओमप्रकाश निर्मल हा 26 वर्षीय तरुण वाहून गेला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे.मुंबईचा पाऊस : कालच्या पावसात अनेकजण बेपत्ता
मुंबईच्या बेभान पावसाने अगदी होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. मुंबईच्या पावसात अडकलेले काही जण अजूनही आपल्या घरी पोहोचलेले नाहीत. ‘एबीपी माझा’चं आवाहन : मुंबईच्या पावसात तुमच्या कुटुंबियांपैकी किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी हरवलं असेल, तर त्यांचं छायाचित्र majhaphoto@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा किंवा #माझाचीशोधमोहीम हॅशटॅग वापरुन आम्हाला @abpmajhatv ला टॅग करुन ट्विट करा. तुमच्या आप्तजनांच्या शोधमोहिमेत, ‘एबीपी माझा’ही तुमच्यासोबत आहे.संबंधित बातम्या :
26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?
मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू
मुंबईत पुन्हा पाऊस सुरु, गरज असेल तरच बाहेर पडा!
मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















