एक्स्प्लोर

Anti-defection law : उद्धव ठाकरेंना नामोहरम करून एकनाथ शिंदे शिवसेनेवर 'सर्जिकल स्ट्राईक' करतील? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?

ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे का? एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून बंडाचा पवित्रा कायम राहिल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा (Anti-defection law) लागू होईल की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Eknath Shinde : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक शिवसेना आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये हाॅटेल मेरेडियनमध्ये तंबू ठोकल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षांतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून सूत्रे हलवण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करताना पहिला कडक संदेश दिला आहे. 

एकनाथ शिंदे यांचं सध्या वास्तव्य असलेला सुरत हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि अर्थातच मोदी-शहा या जोडगोळीचा हा अभेद्य गड असल्याने त्यांना तगडा बंदोबस्त देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे का? एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडाचा पवित्रा कायम राहिल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा (Anti defection law) लागू होईल की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. राजकीय पक्षांना लागू होणारा पक्षांतर बंदी कायदा काय आहे आणि त्या कायद्याच्या चौकटीत कोणत्या तरतुदी आहेत याबाबत आपण जाणून घेऊया

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 1967 पर्यत पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे पक्षांतर करण्याला काहीच मर्यादा राहिल्या नव्हत्या. आजकाल राजकारणात जो आयाराम गयाराम जो शब्दप्रयोग केला जातो त्या शब्दाचा इतिहास पक्षांतर कायदा देशात उदयास येण्यामागे आहे. हरियाणातील पतौडीमधील गयालाल यांनी राजकारणाची पूर्ण रया घालवताना एक दिवसात 3 पक्ष बदलले होते. त्यामुळेच या कायद्याची आवश्यकता भासू लागली. 

आणि पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला

पक्षांतराला आळा घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर समितीने केलेल्या अभ्यासानंतर शिफारशी केल्या. त्यानुसार सर्वपक्षीय एकमताच्या जोरावर 52 वी घटनादुरुस्ती 1985 मध्ये केली गेली. या घटनादुरुस्तीमधून 10 व्या परिशिष्टाचा समावेश केला गेला. तसेच आमदार-खासदारांना अपात्र ठरविणाऱ्या कलमांमध्येही बदल केला गेला. या सर्व तरतुदींना 'पक्षांतरबंदी कायदा' म्हणून ओळखले जाते.

एखाद्या सदस्याला अपात्र कसे ठरवले जाते ?

लोकसभा किंवा विधिमंडळामधील सदस्य पक्षादेशाचे पालन न केल्यास ते अपात्र ठरू शकतात. त्याचबरोबर अन्य पक्षात प्रवेश किंवा पक्षादेश डावलून मतदान केल्यासही सदस्य अपात्र ठरतो. याशिवाय अन्य पक्षांना मदत किंवा त्यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो. 

तर सदस्यत्व कायम 

आपल्या देशात कायद्याला पळवाटा शोधून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रघात नवीन नाही. आणि अर्थातच हा कायदा सुद्धा त्याला अपवाद राहिला नाही. पक्षांतर बंदीच्या कायद्यामध्ये एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैध मानले जात होते. मात्र, 2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास सदस्यत्व कायम राहू शकते.

एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत काय होऊ शकते ? 

बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 22 आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या घडीला विधानभेत शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना 37 आमदारांना पाठिशी घेऊन पक्षांतर करावे लागेल. मात्र, हा आकडा मोठा असल्याने एवढ्या आमदारांचे त्यांना पाठबळ आहे का हे येणारा काळ सांगेल. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा त्यांच्यावर असेल.  
 
एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा झाल्यास तसेच सदस्यत्व सुद्धा कायम ठेवायचं झाल्यास शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळवून गट स्थापन करावा लागेल. 

विधानपरिषदेतील निकालावेळी काय स्थिती होती ?

सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सभागृहातील 285 सदस्यांनी मतदान केले. विधानसभेत 288 आमदारांचे संख्याबळ आहे, परंतु सेनेचे आमदार रमेश लटके यांचे गेल्या महिन्यात निधन झाले आणि राष्ट्रवादीचे सदस्य नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत.

शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. भाजपकडे 106 आमदार आहेत. लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचे संख्याबळ 29 आहे. निकाल पाहता, भाजपने 133 मते मिळवून पाचही उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीला मित्रपक्षांना मिळून 152 मते मिळाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget