एक्स्प्लोर

Sanjay Raut : फडणवीस मदारी, ते डमरू वाजवतायत, इतर दोघे नाचतायत; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे. तर सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागतंय, अशीही टीका राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न विचारल्यास ते कायम दिल्लीत दिसतात. इथे राज्यात बेसावध आरोग्य व्यवस्थेमुळे लोकांचे जीव चालले आहेत, हे दिल्लीत गेले आणि इथे सरकार कोण चालवणार? असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. 

"सरकार दिल्लीतून ईडी आणि सीबीआयने आणलं"

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार ना देवेंद्र फडणवीसांनी आणलं आहे. ना अजित पवारांनी आणलं आहे आणि ना एकनाथ शिंदेंनी आणलं आहे. हे सरकार दिल्लीतून ईडी आणि सीबीआयने आणलं आहे. अजित पवार पळून जाण्याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळून गेले आहेत. 

मुख्यमंत्री कुठे आहे?

मुख्यमंत्री कुठे आहे असं विचारल्यास ते कायम दिल्लीत असल्याचं दिसत आहे. कधी अमित शहांशी रात्री 12 वाजता बैठक घेतात तर कधी जे पी नड्डांना भेटतात. मुख्यमंत्री स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे चेले म्हणवता आणि जे पी नड्डांच्या स्वागताचे बोर्ड लावता. ही लाचारी पत्करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवरआली आहे, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंची शिवसेना ही चॅयना मेड माल झाली आहे. ही राज्याची नाही तर ही चायनाची शिवसेना असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना फोडण्याची हिंम्मत अमित शहांमधेय नाही. ई़डी आणि सीबीआयने ही शिवसेना फोडली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरोनाशी सामना केला. कोरोनाकाळातील राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई  महानगरपालिकेने उत्तम काम केल्याने जगाने आम्हाला मानांकन दिलं आहे. धारावी सारखा भाग मुंबईत असताना कोरोना रोखला आहे, असं बोलत त्यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे. 

साखर कारखानदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप

देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंडच्या भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचं मनी लॉंड्रिंग आहे. गिरडा महोत्सव सहकारी साखर कारखाना 167 कोटींचं मनी लॉंड्रिंग आहे. दादा भुसे तेथील मंत्री आहेत. या सगळ्यात शेतकऱ्यांचे पैसे गेले आहेत. त्यासोबतच हसन मुश्रीफांना सगळे तुरुंगात पाठवायच्या तयारीत होते. मात्र आता ते तुरुंगात न जाता मंत्रिमंडळात गेले आहेत. अनेक साखर कारखानदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही

राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर भारतातील नागरिक बांधत आहे आणि भाजपच्या कामाची जी पद्धत आणि दिशा आहे ती रावणाला शोभणारी आहे. आपल्या राज्यात रावण अत्याचार करत होता आज तसाच अत्याचार सरकार राज्यात आणि दिल्लीत करत असल्याचं ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar Nashik : कांद्याला हमीभाव नाही, टोमॅटोला दहा रुपये किलोचा भाव, जगायचं कसं? शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget