एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : फक्त एक महिना उरला, समृद्धी महामार्गाचं काम संपल्यात जमा; आता नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. नवीन वर्षात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. नव्या वर्षात नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत शक्य होईल.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर प्रवासृ अवघ्या 8 तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचं काम अखेर पूर्ण झालं असून आता फक्त फिनिशिंग बाकी आहे. या अनुषंगाने नव्या वर्षात, म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं (MSRDC) नियोजन आहे.

नव्या वर्षात नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर-मुंबई प्रवास केवळ 8  तासांत पार करता येणार आहे. नागपूर-मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 652 किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत दोन टप्प्यात सुरू झाला आहे. यामुळे इगतपुरी-नागपूर-इगतपुरी हा भाग सहा ते सात तासांत जोडला गेला आहे. आता उर्वरित आणि अखेरचा टप्पा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच हा मार्ग देखील जानेवारीत खुला होईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

डिसेंबरपर्यंत फिनिशिंगची कामं उरकणार

नागपूर-मुंबई प्रवासाचं अंतर 16 तासांवरून केवळ 8 तासांवर आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे तर सुरू झाले, मात्र शेवटच्या टप्प्यास काही कारणामुळे विलंब झाला. यानंतर हा इगतपुरी-आमणे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. सध्या फिनिशिंगची कामं वेगात सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात म्हणजेच, जानेवारीत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत

इगतपुरी-आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास इगतपुरी ते आमणे, म्हणजेच इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत पार करता येणार आहे. आजच्या घडीला हे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी

महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे गेल्या वर्षभरात तब्बल 15 हजारांहून अधिक वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. यानंतर अपघात रोखण्यासाठी गुळगुळीत टायर असलेल्या 500 पेक्षा अधिक वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे वाहनांची आणि टायरची स्थिती चांगली नसल्यास समृद्धी महामार्गावर जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा:

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी, एन्ट्री पॉइंट्सवर तपासणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana Meet Devendra Fadnavis: पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget