Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, 23 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश
Ravindra Waikar: ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
![Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, 23 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश Ravindra Vaikar Shivsena Thackeray Group leader has been summoned by the Economic Offenses Branch Mumbai detail marathi news Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, 23 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/1d74941b0607b4c3cd1b51c1799811d31697807179755720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. दरम्यान त्यासाठी रवींद्र वायकर यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना हे समन्स बजावण्यात आले. दरम्यान रवींद्र वायकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचं समन्स आलं नसल्याचं म्हटलं आहे. तसेच जर कोणतीही समन्स आलं तरी चौकशीला हजर राहणार असल्याचं देखील रवींद्र वायकर म्हणाले.
जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी आधीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी देखील काही आरोपी आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मला कोणतीही नोटीस आली नाही - वायकर
दरम्यान रवींद्र वायकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना अशा कोणत्याही प्रकारची आपल्याला नोटीस अथवा समन्स आलं नसल्याचं म्हटलं. तसेच जरी या संदर्भात कोणतेही समन्स अथवा नोटीस बजावण्यात आली तर चौकशीला देखील हजर राहण्याची तयारी असल्याचं वायकरांनी यावेळी म्हटलं.
भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.
प्रकरण नेमकं काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)