एक्स्प्लोर

राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा

राठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आपली मतं मांडली.

मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी केला. केवळ मराठा आरक्षणाच्यावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आपली मतं मांडली. राज-उद्धवचा मराठा आरक्षणाला विरोध सध्या राज आणि उद्धव ठाकरे आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत आहेत, तर तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत. केवळ मराठा आरक्षणाची मागणी होत असताना आर्थिक निकष का? शिवसेना –मनसेला मराठा समाजाचे कार्यकर्ते चालतात, पण त्यांना मराठा आरक्षण नको, अशी घणाघाती टीका राणेंनी केली. तीन महिन्यात मराठा आरक्षण शक्य मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला किमान तीन महिने लागू शकतात. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊन, विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा संमत करुन मराठा आरक्षण देता येऊ शकतं. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात, असं नारायण राणे म्हणाले. घटना दुरुस्तीची गरज नाही आरक्षण देण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची किंवा घटना दुरुस्तीची गरज नाही, असा दावा राणेंनी केला. राज्य सरकारला असलेल्या अधिकारातूनच आरक्षण देता येतं, हे तामिळनाडू सरकारने दाखवलं आहे. त्यांनी ना घटना दुरुस्ती केली ना संसदेची परवानगी मिळवली, असा दाखला राणेंनी दिला. शिवाय मागासवर्ग आयोगाच्या अहवाल कसाही आला, तरी राज्य सरकार आपल्याला अनुकूल भूमिका घेऊ शकतं, असाही दावा त्यांनी केला. राणे समितीचा अहवाल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते. या समितीने राज्यभरातील विविध घटकांशी संपर्क साधून, मतं जाणून घटनेच्या कलम 15 आणि 16 नुसार मराठा आरक्षण दिलं होतं. सध्या मराठा आरक्षणात कोर्टात टिकलं नाही असं म्हटलं जातं. मात्र केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याने त्याला स्थगिती मिळाली आहे. सरकारने जर वेळोवेळी प्रतिज्ञापत्र सादर केलं असतं, तर कदाचित कोर्टातही हा मुद्दा निकाली निघाला असता, असं राणे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Chandrakant Patil and Ashok Kharat: चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट
चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट
Mumbai News: मुंबईत 40 जणांना हवाय इच्छामृत्यु! देशातल्या हरिष राणाच्या पहिल्या प्रकरणानंतर महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर
मुंबईत 40 जणांना हवाय इच्छामृत्यु! हरिष राणाच्या देशातल्या पहिल्या प्रकरणानंतर महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर
Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
Embed widget