![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नवी मुंबईत पीएम आवास योजनेतील 10 हजार घरे उभारण्यास सर्व पक्षीयांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
नवी मुंबईत प्रकल्प उभा केल्यास मोकळ्या जागेचे अस्तित्व संपणार असून शहराला बकाल स्वरूप येवू शकते असा आरोप भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
![नवी मुंबईत पीएम आवास योजनेतील 10 हजार घरे उभारण्यास सर्व पक्षीयांचा विरोध, आंदोलनाचा इशारा Oppose of all parties to build 10,000 houses under PM Awas Yojana in Navi Mumbai नवी मुंबईत पीएम आवास योजनेतील 10 हजार घरे उभारण्यास सर्व पक्षीयांचा विरोध, आंदोलनाचा इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/12132707/cidco56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांना शहरातील रहिवशांबरोबर सर्व पक्षांनी सुद्धा विरोध करण्यास सुरवात केली आहे. रेल्वे स्थानकामधील पार्किंग, मैदान, एपीएमसीतील ट्रक टर्मिनस अशा मोक्याच्या जागेवर ही घरे उभी राहणार आहेत. जवळपास 10 हजार घरे उभारल्यास मोकळ्या जागा नामशेष होणार असल्याने सिडकोच्या या प्रकल्पाला सर्व स्थरातून विरोध होतोय.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक, वाशी एपीएमसीमधील ट्रक टर्मिनल अशा मोक्याच्या ठिकाणी सिडको घरे उभारणार आहे. अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती होणार आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंग जागेत आणि मोकळ्या भूखंडावर घरांचा प्रकल्प उभारला गेल्यास पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याच बरोबर शहरात हाताच्या बोटावर मोजण्या ऐवढ्या जागाच मोकळ्या सोडल्या आहेत. त्याही रेल्वे स्थानकाबाहेर आहेत. त्यामुळे जर येथे प्रकल्प उभा केल्यास मोकळ्या जागेचे अस्तित्व संपणार असून शहराला बकाल स्वरूप येवू शकते असा आरोप भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. शहराच्या नागरीसमस्येत भर घालणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील मास हाऊसिंग गृहप्रकल्पाला खुद्द भाजपा आमदारानेच विरोध केला आहे.
कुठे किती घरे उभारली जाणार आहेत
- जुईनगर रेल्वे स्थानकाच्या पार्किंग जागेत - 3200 ते 3500
- सानपाडा रेल्वे स्थानक पार्किंग जागेत - 1700 ते 2000
- वाशी एपीएमसी ट्रक टर्मिनल - 3300 ते 3500
भाजपा बरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनीही नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेला विरोध केला आहे. शहरातील लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने आधीच गाड्यांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेने दिलाय. रेल्वे स्थानकांच्या बाहेर आधीपासून दाटीवाटीची लोकवस्ती आहे. त्यात अजून घरांची भर पडल्यास शहराला झोपडपट्टीसारखे स्वरूप येऊ शकते. त्यामुळे सिडकोने हा गृहप्रकल्प नवी मुंबई न उभारता पनवेल शहरात स्थलांतरीत करावा अशी मागणी रहिवाशी करीत आहेत.
पार्किंग जागेच्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला जाणार असला तरी सद्याचे पार्किंग भूमिगत ठेवून वरील बाजूस उंच टावर बांधून घरे तयार करणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सिडको अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)