एक्स्प्लोर

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

मुंबईच्या अवस्थेला फक्त एकटी मुंबई महापालिका जबाबदार नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचाही त्यात वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुंबईची भौगोलिक स्थिती आणि अपेक्षेहून अधिक झालेला पाऊस म्हणून मुंबईचा खोळंबा झाला, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. तसंच मुंबईच्या अवस्थेला फक्त एकटी मुंबई महापालिका जबाबदार नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचाही त्यात वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रश्न - महापौर तुम्ही अंग झटकले आहे. मुंबईकरांना काल त्रास झाला, याला जबाबदार कोण? उत्तर -  मी अंग झटकले नाही. मी वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतोय. समुद्राला भरती होती आणि नाल्यांची क्षमता कमी आहे. प्रश्न - नाल्यांची क्षमता कमी आहे, हे उत्तर देत आहात. पण 2005 साली असाच पाऊस पडला होता, 12 वर्षात का नाही वाढवली नाल्यांची क्षमता? उत्तर – 2005 ची परस्थिती वेगळी होती. ती पूरस्थिती होती. तेव्हाची आणि कालच्या स्थितीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. काल आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र होतो, आपापल्या प्रभागात मदत करत होते. 26 जुलैची तुलना करु नये. पोलीस, प्रशासनचं काम चांगलं होतं. प्रश्न - मुंबईत नैसर्गिक आपत्ती येते, यासाठी आपण सज्ज असणं तितकंच गरजेचं आहे. जगात मुंबईचं नाव आहे, जगभरातून पर्यटक इथे येतात, मोठ-मोठ्या व्यक्ती इते राहतात, त्यावेळी अशी परिस्थिती आल्यावर निंदा केली जाते. उत्तर - मुंबईची भौगोलिक परिस्थिती बघा. प्रश्न - महापौर साहेब किती वर्ष ही कारणं देणार आहात? तुम्ही यंदा महापौर झाले आहात, तुमच्या आधीचे महापौर देखील हीच कारणं देत आले आहेत. उत्तर - नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते, तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी आम्ही जे केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. मी स्वतः काल पावसात अडकलो होतो, माझी गाडी अजूनही सांताक्रुझ भागात तिथेच अडकलीय. आरोप करणारे आणि टीका करणारे करतच राहतील. प्रश्न - पहिल्या पावसात तुम्ही बोललात की पाणी साचलं नाही, दुसऱ्या पावसात तुम्ही बोललात की मेट्रोच्या कामामुळे पाणी साचतंय, आता थेट नैसर्गिक आपत्ती म्हणताय. मग बीएमसीची काहीच जबाबदारी नाहीय का? उत्तर - जबाबदारी नाहीय असं नाही. पण केलेल्या कामाची प्रशंसा केली जात नाही, जीव धोक्यात घालून काम करतात त्याचे कौतुक केलं पाहिजे. प्रश्न- नक्कीच कौतुक करायला पाहिजे आणि करतोय पण ही परिस्थिती का यावी? नाले सफाई, नाल्याची क्षमता का नाही झाली? उत्तर - तुम्ही गल्लत करत आहात. मुंबईत नाल्याची सफाई झाली नसती, तर याधीच पाणी भरलं असतं. काल जे झाले त्याला वैयक्तिक जबाबदार न धरता येणार नाही. प्रश्न - तुम्ही सांगा मग काल मुंबईत पाणी का भरलं? उत्तर – पाणी भरण्याला अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे 8 तासात 315 मिमी पाऊस पडला. दुसरं म्हणजे समुद्रालाही भरती होती. आणि तिसरं म्हणजे नाल्याची क्षमता कमी आहे. एकंदरीत भौगोलिक स्थितीही आपण पाहिली पाहिजे. प्रश्न - काल जी परिस्थिती उद्धभवली, त्याला बीएमसी जबाबदार नाहीय का? एका वाक्यात उत्तर द्या? उत्तर - जबाबदारी एकावर झटकून चालणार नाही. ही जबाबदारी सार्वजनिक आहे,  तुम्ही आम्ही, बीएमसी, राज्य सरकार, केंद्र सरकार जबाबदार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट

व्हिडीओ

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Embed widget