एक्स्प्लोर

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

मुंबईच्या अवस्थेला फक्त एकटी मुंबई महापालिका जबाबदार नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचाही त्यात वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुंबईची भौगोलिक स्थिती आणि अपेक्षेहून अधिक झालेला पाऊस म्हणून मुंबईचा खोळंबा झाला, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. तसंच मुंबईच्या अवस्थेला फक्त एकटी मुंबई महापालिका जबाबदार नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचाही त्यात वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रश्न - महापौर तुम्ही अंग झटकले आहे. मुंबईकरांना काल त्रास झाला, याला जबाबदार कोण? उत्तर -  मी अंग झटकले नाही. मी वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतोय. समुद्राला भरती होती आणि नाल्यांची क्षमता कमी आहे. प्रश्न - नाल्यांची क्षमता कमी आहे, हे उत्तर देत आहात. पण 2005 साली असाच पाऊस पडला होता, 12 वर्षात का नाही वाढवली नाल्यांची क्षमता? उत्तर – 2005 ची परस्थिती वेगळी होती. ती पूरस्थिती होती. तेव्हाची आणि कालच्या स्थितीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. काल आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र होतो, आपापल्या प्रभागात मदत करत होते. 26 जुलैची तुलना करु नये. पोलीस, प्रशासनचं काम चांगलं होतं. प्रश्न - मुंबईत नैसर्गिक आपत्ती येते, यासाठी आपण सज्ज असणं तितकंच गरजेचं आहे. जगात मुंबईचं नाव आहे, जगभरातून पर्यटक इथे येतात, मोठ-मोठ्या व्यक्ती इते राहतात, त्यावेळी अशी परिस्थिती आल्यावर निंदा केली जाते. उत्तर - मुंबईची भौगोलिक परिस्थिती बघा. प्रश्न - महापौर साहेब किती वर्ष ही कारणं देणार आहात? तुम्ही यंदा महापौर झाले आहात, तुमच्या आधीचे महापौर देखील हीच कारणं देत आले आहेत. उत्तर - नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते, तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी आम्ही जे केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. मी स्वतः काल पावसात अडकलो होतो, माझी गाडी अजूनही सांताक्रुझ भागात तिथेच अडकलीय. आरोप करणारे आणि टीका करणारे करतच राहतील. प्रश्न - पहिल्या पावसात तुम्ही बोललात की पाणी साचलं नाही, दुसऱ्या पावसात तुम्ही बोललात की मेट्रोच्या कामामुळे पाणी साचतंय, आता थेट नैसर्गिक आपत्ती म्हणताय. मग बीएमसीची काहीच जबाबदारी नाहीय का? उत्तर - जबाबदारी नाहीय असं नाही. पण केलेल्या कामाची प्रशंसा केली जात नाही, जीव धोक्यात घालून काम करतात त्याचे कौतुक केलं पाहिजे. प्रश्न- नक्कीच कौतुक करायला पाहिजे आणि करतोय पण ही परिस्थिती का यावी? नाले सफाई, नाल्याची क्षमता का नाही झाली? उत्तर - तुम्ही गल्लत करत आहात. मुंबईत नाल्याची सफाई झाली नसती, तर याधीच पाणी भरलं असतं. काल जे झाले त्याला वैयक्तिक जबाबदार न धरता येणार नाही. प्रश्न - तुम्ही सांगा मग काल मुंबईत पाणी का भरलं? उत्तर – पाणी भरण्याला अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे 8 तासात 315 मिमी पाऊस पडला. दुसरं म्हणजे समुद्रालाही भरती होती. आणि तिसरं म्हणजे नाल्याची क्षमता कमी आहे. एकंदरीत भौगोलिक स्थितीही आपण पाहिली पाहिजे. प्रश्न - काल जी परिस्थिती उद्धभवली, त्याला बीएमसी जबाबदार नाहीय का? एका वाक्यात उत्तर द्या? उत्तर - जबाबदारी एकावर झटकून चालणार नाही. ही जबाबदारी सार्वजनिक आहे,  तुम्ही आम्ही, बीएमसी, राज्य सरकार, केंद्र सरकार जबाबदार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget