एक्स्प्लोर

कमरेइतक्या पाण्यातून, मोडक्या पुलावरुन 2-3 किमी पायपीट, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी धडपड

शहापूर तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावरील गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही.

मुंबई : शहापूर तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावर सुमारे 30 ते 35 घर असून 150 ते 200 इतकी लोकवस्ती आहे. या गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही. जंगलातून एक ते दीड किलोमीटर पर्यंत पायपीट करत भातसा कालव्यावर असलेल्या लोखंडी पुलापर्यंत पोहचावे लागते. या पुलाचा उपयोग करुन गावातून बाहेर निघता येते. परंतु हा लोखंडी पूल 40 ते 45 वर्षे जुना असून अतिशय जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा पूल अतिशय धोकादायक झालेला आहे. मात्र असे असतानादेखील येथील शाळकरी मुलं तसेच गावकरी जीव मुठीत धरून याच मोडक्या पुलावरून प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे शाळकरी मुलं ज्यावेळी या पुलावरून प्रवास करतात, त्यावेळी त्यांचे घरात असलेल्या आई-वडिलांच्या मनात धाकधूक सुरु असते. पालकांच्या मनात भीती असते. गावातून बाहेर निघण्यासाठी एकमेव पूल आहे. पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने नागरिकांची या ठिकाणी गैरसोय होत आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी एक दुसरा मार्ग आहे, परंतु तोही धोक्याचा आहे. त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी वाहत आहे आणि या ओढ्यातून जायचं म्हटलं तर कमरे इतके पाणी साचले आहे. त्यामुळे या गावातील काही विद्यार्थी या ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढतात, तर काही या पुलाचा वापर करून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. भातसाच्या कालव्यावर अनेक असे पूल बांधण्यात आले आहेत मात्र जांभूळपाडा या गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव हा लोखंडी पूल आहे आणि तोही मोडक्या स्थितीत. जांभूळपाडा आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन या मोडक्या पुलावरुन तसेच कंबरभर पाण्याच्या ओढ्यातून जातात, पाऊसाचा जोर वाढल्यास या ओढ्याच्या पातळीत वाढही होते. शिवाय गावात रस्ता नसल्याने जंगलातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे जंगलात असलेले सर्प, विंचू तसेच हिंसक प्राण्यांचा धोकाही असतो. आवरे गावानजीक एक काँक्रीटचा फुल आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गावात रस्ताच नाहीये जंगलांतून जरी मार्ग काढला तरी जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. इथल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील लोकप्रतिनिधींचेही या गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान रस्ता बनवून देण्याचे आश्वासन अनेकदा दिले जाते. परंतु रास्ता काही बनत नाही. इथल्या रुग्णांचे पावसाळ्यात खूप हाल होत असून एखादा गावकरी आजारी पडल्यास त्यास चादरीची झोळी करुन दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील शहापूर येथे आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागते. यादरम्यान गरोदर महिला दगावण्याची शक्यता आहे. जांभूळपाडा या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांकरीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवीपर्यंत असून तेथे 24 पटसंख्येसाठी दोन शिक्षक असून रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कधी-कधी त्यांना घरापर्यंत पोहोचवावे लागते. तसेच येथील शिक्षकांनासुद्धा दररोज पाण्यातून किंवा या पुलावरून जीव धोक्यात घालून घरी जावे लागते.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget