एक्स्प्लोर

कमरेइतक्या पाण्यातून, मोडक्या पुलावरुन 2-3 किमी पायपीट, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी धडपड

शहापूर तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावरील गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही.

मुंबई : शहापूर तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावर सुमारे 30 ते 35 घर असून 150 ते 200 इतकी लोकवस्ती आहे. या गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही. जंगलातून एक ते दीड किलोमीटर पर्यंत पायपीट करत भातसा कालव्यावर असलेल्या लोखंडी पुलापर्यंत पोहचावे लागते. या पुलाचा उपयोग करुन गावातून बाहेर निघता येते. परंतु हा लोखंडी पूल 40 ते 45 वर्षे जुना असून अतिशय जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा पूल अतिशय धोकादायक झालेला आहे. मात्र असे असतानादेखील येथील शाळकरी मुलं तसेच गावकरी जीव मुठीत धरून याच मोडक्या पुलावरून प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे शाळकरी मुलं ज्यावेळी या पुलावरून प्रवास करतात, त्यावेळी त्यांचे घरात असलेल्या आई-वडिलांच्या मनात धाकधूक सुरु असते. पालकांच्या मनात भीती असते. गावातून बाहेर निघण्यासाठी एकमेव पूल आहे. पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने नागरिकांची या ठिकाणी गैरसोय होत आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी एक दुसरा मार्ग आहे, परंतु तोही धोक्याचा आहे. त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी वाहत आहे आणि या ओढ्यातून जायचं म्हटलं तर कमरे इतके पाणी साचले आहे. त्यामुळे या गावातील काही विद्यार्थी या ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढतात, तर काही या पुलाचा वापर करून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. भातसाच्या कालव्यावर अनेक असे पूल बांधण्यात आले आहेत मात्र जांभूळपाडा या गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव हा लोखंडी पूल आहे आणि तोही मोडक्या स्थितीत. जांभूळपाडा आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन या मोडक्या पुलावरुन तसेच कंबरभर पाण्याच्या ओढ्यातून जातात, पाऊसाचा जोर वाढल्यास या ओढ्याच्या पातळीत वाढही होते. शिवाय गावात रस्ता नसल्याने जंगलातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे जंगलात असलेले सर्प, विंचू तसेच हिंसक प्राण्यांचा धोकाही असतो. आवरे गावानजीक एक काँक्रीटचा फुल आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गावात रस्ताच नाहीये जंगलांतून जरी मार्ग काढला तरी जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. इथल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील लोकप्रतिनिधींचेही या गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान रस्ता बनवून देण्याचे आश्वासन अनेकदा दिले जाते. परंतु रास्ता काही बनत नाही. इथल्या रुग्णांचे पावसाळ्यात खूप हाल होत असून एखादा गावकरी आजारी पडल्यास त्यास चादरीची झोळी करुन दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील शहापूर येथे आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागते. यादरम्यान गरोदर महिला दगावण्याची शक्यता आहे. जांभूळपाडा या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांकरीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवीपर्यंत असून तेथे 24 पटसंख्येसाठी दोन शिक्षक असून रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कधी-कधी त्यांना घरापर्यंत पोहोचवावे लागते. तसेच येथील शिक्षकांनासुद्धा दररोज पाण्यातून किंवा या पुलावरून जीव धोक्यात घालून घरी जावे लागते.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget