एक्स्प्लोर

तुर्तास मुंबईत अतिरिक्त सशस्त्र दलांची गरज नाही : हायकोर्ट

वांद्रे रेल्वे स्थानकावरील एका घटनेतून अंदाज बांधणं चूकीचं, परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात. कोरोनच्या पार्श्वभूमीवर सध्या सारा समाज एका अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे : हायकोर्ट.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या गर्दीच्या एका प्रकरणामुळे मुंबईत अतिरिक्त सशस्त्र दलाला पाचारण करावे असा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. असं स्पष्ट करत हायकोर्टानं म्हटलंय की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच एका अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जात आहोत. राज्य सरकार आणि संबंधित विभाग परिस्थिती नियंत्रणात ठेवून आहेत. 14 एप्रिलच्या घटनेनंतरही प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे वांद्र्यातील एका घटनेतून सशस्त्र दल मुंबईत उतरविण्याची तुर्तास गरज नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यंची मागणी फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी लागू असताना 14 एप्रिल रोजी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर सुमारे तीन हजार परप्रांतीय मजूर एकत्र आले आणि त्यांनी गावी जाऊ द्या, असा हट्ट धरला होता. त्याविरोधात खार, वांद्रे आणि माहिम परिसरात राहणा-या तीन स्थानिक रहिवाशींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकाराच्या घटना वारंवार घडल्यास कोविड-19 चा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी राज्य सरकारने लष्कर अथवा अतिरिक्त सशस्त्र दलाला तैनात करावे आशी प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; उद्या निर्णय होणार

स्थानिक रहिवाश्यांची याचिका

मुंबईतील कोरोनाबाधित रेड झोनमध्ये स्थानिक प्रशासकीय विभागीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी सैन्यदलास तैनात करावे. तसेच गरज भासल्यास मुंबईत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) यांच्यासह सशस्त्र दलांच्या उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. अशी मागणीही याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली होती. त्याचबरोबर वांद्रे जमावबंदी मोडल्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे. राज्य सरकाकडून याला उत्तर देताना स्पष्ट करण्यात आलं की, त्या घटनेनंतर गर्दीला तेथून तात्काळ हटविण्यात आले होते. तसेच स्थलांतरित मजूरांना टाळेबंदी संपेपर्यंत त्यांच्या खाण्या-पिण्याची, निवार्यांची सोय करण्यात आल्याचे सांगत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला.

CM Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी महाविकासआघाडीचा प्लॅन बी तयार? स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget