एक्स्प्लोर

Sameer Wankhede समीर वानखेडेंकडून तपास काढला; नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात...

Nawab Malik on Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची उचलबांगडी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हटले.

मुंबई: एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून पाच प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणाचाही समावेश आहे. समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांच्याकडून पाच प्रकरणांचा तपास काढून घेतला असला तरी एकूण २६ प्रकरणांची चौकशी आवश्यक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी सातत्याने काही दिवस पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उभे केले होते. त्याशिवाय समीर वानखेडे यांनी अवैध मार्गाने सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या लाइफस्टाइलवरही नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. 

नवाब मलिक यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. एकूण २६ प्रकरणे असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मलिक यांनी म्हटले. ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले. 

आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप याआधी करण्यात येत होता. त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता थेट जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन या संघटनांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Maharashtra Live News Updates: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Embed widget